मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात हस्तक्षेप?

मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात हस्तक्षेप?
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात हस्तक्षेप?

यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या गेल्यानंतर बाजारात तेजी आली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्याचा उद्देश ठेवत पणन महासंघाने मार्चनंतरही केंद्र सुरू ठेवण्याचा विचार चालविला आहे. खासगी बाजारात कापसाला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी राज्य कापूस पणन महासंघापेक्षा व्यापाऱ्यांनाच कापूस विक्रीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पणन महासंघाकडे कापसाची आवक जवळपास बंद झाली आहे, अशा परिस्थितीतदेखील केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी पणन महासंघाने आपली केंद्र सुरू ठेवली आहेत. 

बाजार हमीभावाच्या खाली येऊ नये याकरिता पणनकडून बाजारात हस्तक्षेप केला जातो. सध्या व्यापाऱ्यांकडून कापसाला ५७५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कापूस पणन महासंघाच्या केंद्रावर ५,४५० रुपये हमीभाव आहे. प्रतिक्‍विंटल २५० रुपये हमीभावाच्या तुलनेत अधिक मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांना कापूस देत आहेत. त्यातच चुकारेदेखील नगदी असल्याने शेतकऱ्यांचे प्राधान्य सध्यातरी व्यापाऱ्यांनाच आहे. पणन महासंघाने यवतमाळ येथे पहिले केंद्र सुरू केले; परंतु या केंद्रावर एक बोंडही कापसाची खरेदी झाली नाही.

पणनची केंद्र सुरूच जिल्ह्यात पणन महासंघाने पाच केंद्र सुरू केली आहेत. त्यामधील चार केंद्रांवर सात हजार ३२४ क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे. त्या तुलनेत खासगी व्यापाऱ्यांची कापूस खरेदी ११ लाख ५० हजार क्‍विंटलवर पोचली. दरवर्षी साधारणतः ३१ मार्चपर्यंत केंद्र सुरू असतात. त्यानंतर आवक नसल्याने केंद्र बंद केली जात होती. यंदा शेतकऱ्यांचे हित पाहता केंद्र मार्चनंतरही सुरू राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com