आंदोलनस्थळी पार पडला शुभविवाह !

आंदोलनस्थळी पार पडला शुभविवाह
आंदोलनस्थळी पार पडला शुभविवाह

गांधीग्राम, जि. अकोला : सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्याला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. गांधीग्राम येथील अकोट विवाह सोहळा पार पडणार होता, मात्र बंद असल्यामुळे काय होणार असा प्रश्न वऱ्हाडी मंडळींना पडला होता. परंतु, मराठा आंदोलनाच्या स्थळीच त्यांचा शुभविवाह पार पडला.

गांधीग्राम (ता.अकोला) येथील पांडुरंग अढाऊ यांचा मुलगा चि. अभिमन्यु व देऊळगाव (ता.अकोट) येथील हरिदास गावंडे यांची कन्या चि.सौ.कां.तेजश्विनी यांचा विवाह रितिरिवाजप्रमाणे गुरुवारी (ता. ९) रोजी करण्याचे ठरविले होते. मात्र मराठा समाजाचा मोर्च्याची तारीख तीच ठरली, सर्वांच्या मनात धाकधूक सुरू होती. नेमके काय करायचे समजत नव्हते. लग्नाची तारीख रद्द करता येत नव्हती कारण सर्व तयारी आटोपली होती व दुसरी तिथही निघणार नव्हती.

अशातच गुरुवारी सकाळी वऱ्हाड लग्नाला अकोटला निघालं मात्र लग्नाचे वऱ्हाडी आहेत म्हणुन आंदोलकांनी वाहनांना अडविलेही नाही, शिवाजी चौक अकोट येथे मोठ्या प्रमाणात जमाव होता अशातच आंदोलकांनी शिवाजी चौकात लग्न लावण्याची विनवणी केली. लगेच वधू व वर पक्षाने ही विनवणी मान्य केली व शिवाजी चौक अकोट येथे त्यांचा शुभविवाह लावण्यात आला. यावेळी मंगलाष्टके म्हणुन विवाह पार पडला. त्यांनतर रितिरिवाजप्रमाणे ए.पि.एम.सी.अकोट येथे बाकीचे सर्व कार्यक्रम पार पडले. यासाठी अकोटच्या कार्यकर्त्यांनी शांततेत कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com