किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचे

कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या पावसाने कंटाळून गेलाय शेतकरी...हात टेकलेत आमचे... सरकारनं लक्ष घालावं.
jalna
jalna

जालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या पावसाने कंटाळून गेलाय शेतकरी...हात टेकलेत आमचे... सरकारनं लक्ष घालावं...वरुड येथील द्राक्ष उत्पादक गणेश म्हस्के अतिवृष्टीने झालेल्या व होत असलेल्या नुकसानीची व्यथा मांडत होते. ही व्यथा मांडत असतानाच पावसाची रिपरिप सुरू झाली, अन्‌ त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळणेच बाकी होते. 

श्री. म्हस्के म्हणाले, ‘‘आमच्या परिसरात कडवंची, वरुड, धारकल्याण, पिरकल्याण, इंदापूर या प्रमुख गावशिवारांसह इतरही ठिकाणी द्राक्ष बागांचा विस्तार झाला आहे. यंदा एका बागांवर सव्वा लाख खर्च झाले. पण घड जिरण्याचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. शिवाय डाऊनीचा प्रादुर्भावही मोठा आहे. गेल्या हंगामात लॉक डाऊनने मारले. आता पाऊस सुचू देईना. अनेकांच्या बागेतील घड जिरलेत, त्यामुळे नुकसान अटळ आहे. मायबाप सरकारनं भविष्यातील नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन दखल घ्यावी.’’ 

जालना जिल्ह्यात पावसाची सरासरी ६०३.१ मिलिमीटर इतकी आहे. २१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यात प्रत्यक्षात १०२७.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सतत व अतिवृष्टी रूपातील पावसाने यंदाच्या खरिपाची दाणादाण केली आहे. मूग, उडीद, हातचे गेले, कपाशीवर संक्रांत आली. फळपिकांची वाताहात झाली, द्राक्षाचं भविष्य अंधकारमय झालं.  सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्र बाधित  जालना जिल्ह्यात यंदा ६ लाख ५५ हजार ३३७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यापैकी जवळपास ५ लाख १६ हजार ६४७ शेतकऱ्यांच्या ४ लाख २५ हजार २०५ हेक्टर क्षेत्राला जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाचा दणका बसला. भरपाईसाठी ३१४ कोटी ९१ लाख ९३ हजार ३३३ रुपयांची गरज आहे.  मोठ्या प्रमाणात जमीन खरडली  जालना जिल्ह्यातील बदनापूर, मंठा, अंबड व घनसावंगी याच्या तालुक्यातील ८ हजार ६१३ शेतकऱ्यांची जवळपास २ हजार ५३७ हेक्टर ८२ गुंठे जमीन अति पाऊस व पुरामुळे खरडून गेली आहे. जमिनीच्या दुरुस्तीसाठी शासन निर्णयाप्रमाणे प्रतिहेक्‍टरी ३७ हजार ५०० प्रमाणे ९ कोटी ५१ लाख ६८ हजार २५० रुपयांची गरज आहे.    ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र  जिरायती क्षेत्र : ३९७४३१.०६ हेक्टर  शेतकरी संख्या: ४७५८०२  अपेक्षित निधी(हेक्टरी ६८००) : २७०,२५,३१,२०८  बागायती क्षेत्र: १११०० हेक्टर  शेतकरी संख्या: १७०३८  अपेक्षित निधी (हेक्टरी १३५००) : १४,९८,५६,८२५  फळपिक क्षेत्र : १६४८९.१८  शेतकरी संख्या : २३८०७  अपेक्षित निधी (हेक्टरी १८०००) : २९,६८,०५,२४०  पीकनिहाय नुकसानीचे क्षेत्र(हेक्टरमध्ये)  जिरायती पिके  कापूसः १९५१६०.७७  मकाः ६६२८.४८  बाजरीः १०४०५  मूगः ५२११२.४७  तूरः १९२०९.४९  उडिदः ९७२२.२  सोयाबीनः १०२२५६.३९  इतरः १९३६.३८  बागायती पीके  मिरचीः ७०६६.६५  कांदाः १७३.९५  भाजीपालाः १०९३.२७  ऊसः १३८०  इतरः १३८६    फळपीक  द्राक्षः ७७७.१४  पपईः ४०४.६६  डाळिंबः २९१५.३३  पेरूः ६९.८१  मोसंबीः ११८३५.२७  चिकूः ६४.४०  संत्राः २  सीताफळः ३४.३३  लिंबूः ३९.९०  केळीः ३९.५०  प्रतिक्रिया चार एकर कपाशीत आंतरपीक मूग घेतला, त्याच खत झालं आणि क्विंटल कापूस हाती आला. आणखी तीन चार क्विंटल येईल, पण तो बी भिजला. मकातून अजून पाणी वाहतय.  - प्रकाश शिंदे, वरुडी, ता. बदनापूर, जि. जालना  जिथं ५०० ते ६०० कॅरेट सीताफळ निघायला हवे, तिथं १२५ कॅरेट निघाले, एकाच वेळी सीताफळ आल्याने दरानेही मारलं. पावसानं शाश्वत सीताफळाचीही दाणादाण केली.  - प्रकाश उबाळे, नंदापूर, ता. जि. जालना  तीन एकरात ३५ हजार खर्च केल्यावर साडेसात क्विंटल सोयाबीन झालं. दर्जा चांगला नाही. तुरीला काय घडल ते सांगता येणार नाय. लाखभर रुपये बँकेतून पीक कर्ज काढून लावले.  - बद्रीनाथ शिंदे, वरुडी, ता. बदनापूर, जि. जालना  गेल्या वर्षी द्राक्ष बागेवर सव्वा लाख खर्च केले. परतीच्या पावसानं पूर्ण बागेतील घड जिरून गेले. त्याचा विमा बँकेत आला, पण मला अजून मिळाला नाही. यंदा ४० टक्के फटका बसलाय.  - संजय उबाळे, नंदापूर, ता. जि. जालना.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com