राज्यात ‘मी शेतकरी’ अभियान सुरू : डॉ. अजित नवले

मी शेतकरी अभियानास प्रारंभ
मी शेतकरी अभियानास प्रारंभ

नगर  : शेतकऱ्यांचे प्रश्‍न निवडणुकीत मुख्य मुद्दे म्हणून केंद्रस्थानी आणण्यासाठी बुधवारपासून (ता. २) राज्यभर किसान सभा व शेतकरी संघटनांचे मी शेतकरी अभियान सुरू झाले आहे, असे अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट हमीभावासाठी कायदा व डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या मागण्या केंद्रस्थानी आणण्यासाठी गावोगाव हे अभियान राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत गावांमधील पारावर, चावडीवर शेतकरी निवडणूक काळात ठिय्या देणार असून, प्रचारासाठी गावात येणाऱ्या शेतकरी विरोधी राजकीय पक्षांना शेतकरी प्रश्‍नांबाबत जाब विचारणार आहेत.  सभा घेणाऱ्या पक्षांना शेतकरी कर्जमुक्ती व हमीभावाबाबत भूमिका मांडण्यास भाग पडणार आहेत.

बुधवारी अकोले (जि. नगर) येथे भव्य शेतकरी रॅली काढून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. सांगली, कोल्हापूर, बुलडाणा, अमरावतीसह राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी तथा तहसीलदारांना निवेदन देऊन हे अभियान सुरू करण्यात आले असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com