वळई, वडजलला बाजरी पीक भुईसपाट

गाव पातळीवरील अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर हे काम आमच्याकडे नाही सांगतात. प्रशासनाने तातडीने प्रत्येक गावात जाऊन शेती, विहीर आणि घरे यांचे पंचनामे करावेत. पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. - बबन काळेल, माजी सरपंच.
पावसामुळे बाजरीचे पीक आडवे
पावसामुळे बाजरीचे पीक आडवे

कुकुडवाड, जि. सातारा  : माण तालुक्‍यात दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना शेतीतून कोणत्याही प्रकारचे उत्पादन काढता आले नव्हते. यंदा खरीप हंगामात सुरवातीस झालेल्या रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी कमी ओलीत पेरलेले बाजरीचे पीक ऐन बहरात असताना पावसामुळे भुईसपाट झाले आहे. 

शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बाजरीचे पीक बहरात आले होते. ऐन भरात पीक जाणार असे वाटत होते. पण, उरमोडीचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. टपोरे दाणेदार पीक शेतात डोलत होते. या वर्षी पसा-कुडता होणार असे वाटत असताना अचानक आलेल्या पावसाने एका रात्रीत होत्याचे नव्हते करून ठेवले. उभे पीक भुईसपाट झाले. यामुळे ‘उरमोडीने तारले, पण निसर्गाने मारले’ अशी म्हणण्याची वेळ माण तालुक्‍यातील वळई, वडजल परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. 

वळई येथील शेतकरी भगवान काळेल यांनी सांगितले की वळई, विरळी, चिलारवाडी परिसरांतील शेतकऱ्यांचे पावसामुळे शेतांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वळई येथील बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गावातील १५ विहिरी बुजल्या आहेत. कृषी विभागाचे सहा नाले आणि पाणी फाउंडेशनमधील पाच नाले फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून दखल घेतली गेलेली नाही. पंचनामे अजूनही झाले नाहीत. यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. पिकाची, शेतीची आणि घरांची नुकसानभरपाई मिळणार का, याची चिंता लागून राहिली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com