खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला आहे. बाजारातील आवक कमी होत असून, दरात क्विंटलमागे २५ रुपयांनी सुधारणा झाली. बाजरीला सुरवातीला १८०० ते २२०० रुपये क्विंटलपर्यंत दर होते. सध्या १९०० ते २२२५ रुपये क्विंटल दर जळगाव, अमळनेर, चोपडा (जि. जळगाव) व शिरपूर (जि. धुळे) येथील बाजारात मिळत आहेत. 

बाजरीची पेरणी शिरपूर, चोपडा, शिंदखेडा (जि. धुळे), पाचोरा, जळगाव, जामनेर व चाळीसगाव (जि. जळगाव) या भागात बऱ्यापैकी झाली होती. आगाप पेरणीच्या बाजरीची मळणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाली, तर जानेवारीच्या मध्यात पेरणी केलेल्या बाजरीची मळणी मे महिन्याच्या सुरवातीला झाली. सध्या अपवाद वगळता कुठेही मळणी, काढणी सुरू नाही. मळणीचा हंगाम जवळपास आटोपला आहे.

सुरवातीला बाजरीला कमाल २२०० रुपयांपर्यंतचे दर शिरपूर, चोपडा, जळगाव या भागात होते. नंतर किमान दर १८०० पर्यंत आले होते, परंतु जशी आवक कमी झाली, तशी दरात क्विंटलमागे २५ रुपयांनी सुधारणा मागील आठवड्यात झाली. आवक अगदी नगण्य असून चोपडा, अमळनेर व जळगाव बाजारात मिळून प्रतिदिन १०० क्विंटलपर्यंत पुरवठा होत आहे. उठाव चांगला आहे. मालेगाव, चाळीसगाव, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, पाचोरा, भडगाव, शिंदखेडा, नंदुरबार, सटाणा भागात बाजरीला अधिक ग्राहक आहेत. आवक कमी असल्याने लागलीच लिलाव आटोपून शेतकऱ्यांना रोखीने पैसे मिळत आहेत. चोपडा, जळगाव बाजारात पुढील महिन्यात आवक आणखी कमी होईल, असा अंदाज आहे. यामुळे पुढे दरात आणखी सुधारणा अपेक्षित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com