नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे मॉडेल आहे. लोकसहभाग असेल तर शासनाची प्रत्येक योजना संपूर्ण आर्थिक, सामाजिक व गावाचे परिवर्तन घडू शकते. तापमानवाढीच्या बदलाचे होणारे परिणाम याबद्दल गावाने केलेले नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत हरियाना राज्याचे सचिव डॉ. राजेश खोत यांनी व्यक्त केले.
हरियानाचे सचिव डॉ. खोत यांच्यासह तेथील उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी व विकास सेवेतील एकूण २६ प्रमख अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २२) आदर्श गाव हिवरेबाजारला भेट देऊन तेथील विकासकामांची व विविध उपक्रमांची पाहणी केली. आदर्श गाव योजना संकल्प व प्रकल्प समितचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी अधिकाऱ्यांना हिवरे बाजारने केलेल्या कामांची व उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.
या वेळी डॉ. खोत म्हणाले, ‘‘लोकसहभागातून गावाचे नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे. शालेयस्तरापासूनच स्वच्छता, पाणी व पीक नियोजन हे अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामुळेच आज हिवरे बाजार देशाच्या नाहीतर आंतरराष्ट्रीय समुदायाला रोल मॉडेल ठरेल. येथील अभ्यासातून देशातील ग्रामपंचायती सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल. गेली ३० वर्षे या गावाने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून समृद्ध गाव करताना अनेक चढउतार पाहिलेत.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.