राज्यात मॉन्सून रेंगाळणार

बंगालचा उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्रात हवेचे कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मान्सूनोत्तर पाऊस काही दिवस रेंगाळण्याची चिन्हे आहेत.
monsoon express
monsoon express

पुणे ः बंगालचा उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्रात हवेचे कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मान्सूनोत्तर पाऊस काही दिवस रेंगाळण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.   हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेनुसार राज्याच्या उत्तर भागातून ५ ऑक्टोबरला माघारी घेण्याची शक्यता होती. तर मुंबईतून माघारी घेण्याची तारीख ८ ऑक्टोबर होती. मात्र, चालू वर्षी हवामान विभागाने परतीच्या पावसासाठी १७ ऑक्टोबर ही नवीन तारीख जाहीर केली होती. गेल्या बारा दिवसांत परतीच्या मॉन्सूनने अरबी समुद्र, गुजरात व मध्य प्रदेशातून माघार घेतली आहे. मागील पाच ते सहा दिवसांत राज्यातील वातावरणात वेगाने बदल झाल्याने दोन दिवसांपासून विविध भागांत पाऊस पडत आहे. बंगाल उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी दरम्यान सरकेल. तसेच आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. दोन ते तीन दिवस ही स्थिती राहणार आहे. त्यामुळे परतीचा पाऊस काही दिवस रेंगाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातूनही उशिराने मॉन्सून सरकण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात पावसाचा प्रभाव वाढला असून राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून मराठवाड्यात उघडीप आहे. तर विदर्भातील अनेक भागात पाऊस पडत असल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com