खरीप नुकसानीपोटी आणखी १३४ कोटी

खरीप नुकसानीपोटी आणखी १३४ कोटी
खरीप नुकसानीपोटी आणखी १३४ कोटी

सोलापूर : गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तिसऱ्या हप्त्यापोटी १३४ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला. या नुकसानीपोटी यापूर्वीच १९५ कोटी रुपये प्रशासनाला मिळाले आहेत. त्याचे वाटप तालुकास्तरावर सुरू आहे.  त्यात आता १३४ कोटी रुपये मिळाले. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला एकूण ३२९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला.  

जिल्ह्यात या हंगामात केवळ ३८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप केव्हाच हातचा गेला. पण रब्बीही गेला. रब्बी हा जिल्ह्याचा मुख्य हंगाम आहे. पण हातात काहीच न लागल्याने शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. त्यापूर्वी जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने खरीप हंगामातील पीक नुकसानीपोटी भरपाई देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.

यापूर्वी १९५ कोटी रुपये प्रशासनाने तहसील कार्यालयाकडे वळते केले. आता त्यात १३४ कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे बऱ्यापैकी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामाची नुकसानभरपाई देण्यासाठी तालुकानिहाय याद्या तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ७१२ गावातील ३ लाख ७४ हजार ३६१ शेतकऱ्यांच्या याद्या तयार आहेत. त्यापैकी २ लाख ३२ हजार ४९९  शेतकऱ्यांच्या खात्यावर ६४ कोटी ८६ लाख ५९ हजार रुपये जमा करण्यात आले. आणखी ही प्रक्रिया सुरूच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com