मुंबई : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष बाजूला ठेवून वाढीव मदत करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता.१०) दिली. तसेच, हे शासन खंबीरपणे कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तत्पूर्वी, रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदुर्गला २५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. नुकसानभरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सूचना विभागाला देण्यात आल्या होत्या. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बदललेल्या निकषाप्रमाणे सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले; तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदललेल्या निकषांची माहिती दिली. शेतकऱ्यांचा कापूस शासन खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपत्कालीन यंत्रणेने, कर्मचाऱ्यांनी चक्रीवादळग्रस्त भागातील परिस्थिती चांगली हाताळल्याचे सांगितले. अशी देणार भरपाई
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.