सोलापूर ः गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वांत जास्त फटका बार्शी तालुक्याला बसला आहे. या पावसामुळे पाझर तलाव, सिमेंट बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, गाव तलाव, साठवण तलाव अशा सुमारे ७० तलावांचे नुकसान झाले आहे. या सर्व कामांच्या दुरुस्तीसाठी किमान अडीच कोटी रुपयांची गरज असल्याचे जलसंधारण विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या महिन्यात १४ आणि १५ ऑक्टोबरला जिल्ह्यात पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पुराची स्थिती निर्माण झाली. भोगावती, सीना या नद्यांमुळे मोठा फटका बार्शी तालुक्याला बसला. त्याशिवाय पाऊसही तालुक्यातील बहुतेक सर्व भागात मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळेही नुकसान वाढले. त्यात शेतीपिकांसह तालुक्यातील तलाव आणि बंधाऱ्यांचेही नुकसान झाले.
या पावसामुळे प्रामुख्याने ४६ सिमेंट बंधारे, ११ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, ११ पाझर तलाव, दोन गाव तलाव अशा ७० ठिकाणी नुकसान झाले आहे. या कामासाठी सुमारे दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे जलसंधारण विभागाकडून सांगण्यात आले.
अनेक बंधाऱ्यावरील स्लॅप, दारे, संरक्षण भिंत, बाजूचे भराव पाण्याच्या तीव्र प्रवाहाने वाहून गेले आहेत. नुकसानीचा विचार करता भविष्यात पाण्याच्या साठवणुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या तलाव आणि बंधाऱ्यांची वेळीच दुरुस्ती महत्त्वाची आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.