'कापूस खरेदी बंद केल्यास आंदोलन'

'कापूस खरेदी बंद केल्यास आंदोलन'
'कापूस खरेदी बंद केल्यास आंदोलन'

यवतमाळ  ः खासगी बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा खाली आहेत. त्यामुळे सीसीआयला कापूस देण्यावर शेतकऱ्यांचा भर असताना खरेदी केंद्रच बंद करण्याचा घाट घालण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता या विरोधात आंदोलनाचा इशारा शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी दिला आहे.  ‘‘यवतमाळ जिल्हा हा कापूस लागवडीसाठी पोषक मानला जातो. त्यामुळेच या भागात सुमारे पाच लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. 

यवतमाळ तसेच परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी सीसीआयने एम. आय. डी. सी. परिसरातील गायत्री, पार्वती तसेच धामनगाव रोडवरील सागर जीन येथे तीन ठिकाणी केंद्र सुरू केले आहेत. यातील काही केंद्र बंद करण्याचा घाट सीसीआयकडून घालण्यात आला आहे. बाजारात व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा तब्बल १ हजार रुपये कमी दराने कापसाची खरेदी होत आहे. शासनाने ५५५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. शेतकऱ्यांचे यात आर्थिक नुकसान होत असल्याने सीसीआयने बाजारात दबाव वाढविण्यासाठी खरेदी केंद्र सुरू ठेवावे,’’ अशी मागणी सिकंदर शहा यांनी केली आहे. यवतमाळ येथील सीसीआयचे त्यासोबतच जिल्ह्यातील पणन महासंघ तसेच सीसीआयचे इतरही केंद्र सुरू ठेवावे, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे.  यापूर्वी आर्णी येथील संकलन केंद्र काही दिवसांसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी आपला कापूस यवतमाळ परिसरातील शासकीय केंद्रावर विक्रीसाठी आणला. त्यामुळे यवतमाळमधील केंद्रावर लोड वाढीस लागला होता.  यामुळे शेतकऱ्यांवर आणि खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर ताण वाढीस लागतो. पणन किंवा सीसीआयने जिल्ह्यात केंद्र बंद केल्यास त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com