'माझे फोन टॅप केले जाताहेत',राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप 

'माझे फोन टॅप केले जाताहेत',राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप 
'माझे फोन टॅप केले जाताहेत',राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप 

पुणे : "माझ्यासह प्रमुख कार्यकर्त्यांचे फोन टॅप केले जात असून जे माझ्या संपर्कात आहेत त्यांना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेतले जात आहे", असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला. 

"आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या आधी पोलीस पोहोचत आहेत", असेही ते म्हणाले. 

यंदाच्या हंगामातील उसाची एफआरपी नियोजित वेळेत न दिल्याने विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर खा. शेट्टी यांनी आरोप केला आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना शेट्टी म्हणाले, "उसाची एफआरपीची रक्कम कारखानदारांनी दिली नसल्याने ऊस उत्पादक अडचणीत असून आमच्या संयमाचा बांध फुटत आहे. त्यामुळेच आक्रमक आंदोलन केले जात आहे". 

फोन टॅपिंगचा आरोप करत शेट्टी म्हणाले, "रविवारपासून माझे ज्यांच्या-ज्यांच्या बरोबर आंदोलनासंदर्भात बोलणे होत त्यांना आज ताब्यात घेतले जात आहे, हाच फोन टॅपिंगचा धडधडीत पुरावा आहे. आताच्या घडीला ज्यांनी माझ्यासोबत संपर्क साधला आहे, तो एकतर पोलिसांच्या ताब्यात आहे किंवा भूमिगत आहे. आमचा मूलभूत अधिकार संकुचित करण्याचा अधिकार यांना दिला कोणी? हा गंभीर प्रकार असून यावर मी संसदेत आवाज उठवणार आहे". 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com