नगर ः महिनाअखेर असल्याने जिल्हा बॅंकेत पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची लगबग सुरु असते. कर्ज भरण्याला अडचणी येऊ नये, यासाठी ‘होळी’ चा दिवस वगळता सुटीच्या दिवशीही बॅंक सुरु राहील. यंदा जास्तीत जास्त वसुली करून शेतकरी थकबाकीतून नियमित करण्यावर भर दिला आहे. कर्ज वसुलीसाठी कर्मचारीही दक्ष झाले आहेत.
जिल्हा बॅंकेने यंदा ३२०० कोटी रुपये शेतकऱ्यांना पीककर्जापोटी वाटप केले. याशिवाय पूरक उद्योगासाठी २५० कोटी रुपये वाटले आहेत. आता मार्चअखेर असल्याने कर्ज वसुली केली जात आहे. आतापर्यंत झालेल्या तीनही कर्जमाफीत न बसलेल्या थकबाकीदार साधारण पाच हजार शेतकऱ्यांकडे १०० कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम आहे. जे सभासद नियमीत खातेदार आहेत, त्यांना प्रोत्साहन अनुदान देणार असल्याची सरकारने घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांनी दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम असलेल्या खातेदाराने नियमित भरणा करावा. ते प्रोत्साहन अनुदानाला पात्र होतील यासाठी वसुली सुरु केली आहे.
‘यंदा वसुली वर्ष साजरे’
‘‘महिनाअखेरीला अजून आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अगदी शेवटच्या चार दिवसांत अधिक शेतकरी भरणा करतात. हे गृहीत धरून जिल्हा बॅंकेने सुट्टीच्या दिवशीही सर्व शाखा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा बॅंक वसुली वर्ष साजरे करत आहोत,’’ असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.