नागपूर ः लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत फळे व भाजीपाल्याचे सुलभ वितरण होण्याकरिता कृषी विभागाकडून शेतकरी ते ग्राहक संकल्पनेअंतर्गत शहरात तब्बल ५४ गटांना थेट विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांसह काही गटांनी २७ मार्चपासून आजवर तब्बल सात क्विंटल फळ भाजीपाल्याची विक्री केल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
लॉकडाऊन अनेकांसाठी अडचणीचा ठरत असला तरी शेतकरी गट, कंपन्या तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांमध्ये विपणनाचे कौशल्य निर्माण करण्यास पूरक ठरला आहे. नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांच्यासह पथकाने देखील शेतकरी ते ग्राहक संकल्पने अंतर्गत थेट विक्रीसाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गटांना प्रोत्साहन दिले.
नागपूर जिल्ह्यातील ५४ वैयक्तिक शेतकरी, गट, कंपन्या यांना नागपूर शहरात विक्रीसाठी परवानगी देण्यात आली. त्यामध्ये दहा वैयक्तिक शेतकरी तर ४० गट व उर्वरित चार कंपन्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना विक्रीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये याकरिता कृषी विभागाकडून पासेस वितरित करण्यात आल्या. २७ मार्च पासून ६५०० पावणे हजार सात हजार क्विंटलची विक्री आजवर या माध्यमातून झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
नागपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे म्हणाले की, शेतकरी, शेतकरी कंपनी व गटांना शहरात फळे, भाजीपाला विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या माध्यमातून सुमारे ७०२५ क्विंटल शेतमालाची विक्री २७ मार्च पासून आजवर झाली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.