नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर १३०, नोंद मात्र ५०० रुपयांची 

सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने गोल्टी कांद्याला १६० रुपये क्विंटलप्रमाणे बोली लावली असताना बाजार समितीने याच दिवशी किमान दर ५०० रुपये राहिल्याची नोंद केली आहे.
onion
onion

नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने गोल्टी कांद्याला १६० रुपये क्विंटलप्रमाणे बोली लावली असताना बाजार समितीने याच दिवशी किमान दर ५०० रुपये राहिल्याची नोंद केली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या कामकाजावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. प्रत्यक्ष लिलाव व बाजार समितीत दराच्या नोंदी वेगवेगळ्या असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, की सोमवार द्याने (ता. सटाणा) येथील शेतकरी सतीश कापडणीस यांनी १७ क्विंटल गोल्टी कांदा विक्रीस आणला होता. सकाळच्या सत्रात या कांद्याला प्रतिक्विंटल १३० रुपये बोली लागली, तर दुपारच्या सत्रात पुन्हा लिलावात १६० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बोली लागली. मग ही नचांकी नोंद असताना बाजार समितीत ५०० रुपये किमान दराची नोंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालय व पणन विभागाला खोटी माहिती पुरवली जाते की काय, याबाबत शंका उपस्थित होत आहे. 

एकीकडे राज्यातील बाजार समित्यांची आवक व दरासंबंधी माहिती महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या संकेतस्थळावर अद्यावत असते. मात्र नामपूर बाजार समितीची माहिती का नाही, असे अनेक प्रश्‍न या संशयाला कारण ठरत आहेत. 

बाजार समितीच्या कामकाजासंबंधी उपस्थित प्रश्‍न 

  • लिलाव झाल्यानंतर सौदा पट्टीवर रकाना असताना शेतकऱ्याचे नाव, गाव असा उल्लेख का केला जात नाही? 
  • लिलावात बोलले जाणारे किमान दर व बाजार समितीने जाहीर केलेला किमान दर यात तफावत का? 
  • माहिती समोर असताना शेतकरी खोटे बोलतात, असा सभापती आरोप नेमका कुणासाठी करतात? 
  • खोट्या माहितीची नोंद अन् सभापती अनभिज्ञ  बाजार समितीचे सभापती शांताराम निकम यांना संपर्क केला असता शेतकऱ्याने पत्रकारांना खोटी माहिती दिल्याचे सांगितले. यावर तुम्ही शेतकऱ्याला खोडले का नाही, असे विचारले असता त्यांनी बोलणे टाळले अन् सचिवांकडे फोन दिला. यावर सचिव संतोष गायकवाड यांनी सांगितले, की माल खराब असल्यास कमी दर मिळतो. त्यामुळे माध्यमात चर्चा होत असल्याने नीचांकी दराची नोंद टाकत नाही यापुढे टाकू.’’ मात्र सभापती याबाबत अनभिज्ञ असताना शेतकऱ्यांवर आरोप कुणासाठी करतात, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.  प्रतिक्रिया गोल्टी कांद्याचा आकार व रंग याची मला कल्पना आहे. मात्र रास्त दर न देता मातीमोल दराने बोली लागल्याने मी माल दिला नाही. किलोला १२ रुपये खर्च असताना दीड रुपया बोली लागते, हे दुर्दैवी आहे.  - सतीष कापडणीस, कांदा उत्पादक, द्याने, ता. सटाणा  नामपूर बाजार समितीत १ रुपये ६० पैसे किलोने कांदा विकला असताना किमान ५ रुपये किलोचे दर दाखविले. शेतकऱ्यांचे दुर्दैव हे आहे, जे लोक खोटे बोलतात त्यांच्याच दारात परत कांदा विक्री करावी लागणार आहे. शासनाचा बाजार समित्या व व्यापारी वर्गावर अंकुश नाही.  - अभिमन पगार, जिल्हा उपाध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com