नांदेड : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक ४५८ कोटी ८९ लाखांचा विमा परतावा नांदेड जिल्ह्याला मंजूर झाला आहे. या कामात प्रशासनाने विमा कंपनी, तसेच कृषी विभागाच्या समन्वयाने शेतकऱ्यांकडून आलेल्या पूर्वसूचनांचे सर्वे त्वरित संपविले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पंतप्रधान पीकविमा योजनेत इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे खरीप हंगाम २०२१-२२ साठी नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला. ऑगस्ट तसेच सप्टेंबर या महिन्यांत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती उद्भवली. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तब्बल चार लाख पूर्वसूचना दाखल झाल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्यासह विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सर्वे तत्काळ पूर्ण करून शंभर टक्के विमा परतावा मिळावा, अशी भूमिका घेतली. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे वेळेत विमा मंजूर झाला.
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर विमा परतावा मिळावा, यासाठी कृषी विभागासह विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. - डॉ. विपिन, जिल्हाधिकारी, नांदेड
मंजूर विमा परताव्यात जवळपास सर्वच सोयाबीन उत्पादकांचा समावेश आहे. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.