पीक उत्पादनासाठी पाणी व माती या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचा ताण व उच्च तापमानास सहन करणारे वाण निर्माण करणे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने व कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्याकरिता गरजेचे ठरणारे आहे.
भविष्याचा विचार करता कडधान्य पिकाच्या नवीन वाणाची वाढत्या जैविक, अजैविक ताणात टिकून राहून उत्पादकतेमध्ये वाढ कशी होईल याचा अभ्यास करणे गरजेचे हे. अधिक कालावधी, अधिक पाणी लागणारे कडधान्य पिकांचे वाण भविष्यात निष्फळ ठरणार आहेत. जगात कडधान्यांचा सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि आयातदार अशी भारताची ओळख आहे. कडधान्य ही प्रथिनांनी समृध्द असतात. १०० ग्रॅम कडधान्यामध्ये १७ ते २५ टक्क्यांपर्यंत प्रथिने असतात. याला अपवाद म्हणजे सोयाबीन यामध्ये प्रथिनांचे प्रमाण ४०-४२ टक्के असते. शाकाहारी आहारामध्ये प्रथिनांची पूर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते. प्रथिनाव्यतिरिक्त कडधान्यामध्ये ब जीवनसत्वे, खनिजे आणि मेद भरपूर प्रमाणात असतात. तूर
मूग व उडीद
संपर्कः डॉ. नंदकुमार कुटे, ७५८८५१३३९८ (कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.