कृषी विभाग आणि विद्यापीठात समन्वयाची गरज ः डॉ. विलास भाले

कृषी विभाग आणि विद्यापीठात समन्वयाची गरज ः डॉ. विलास भाले
कृषी विभाग आणि विद्यापीठात समन्वयाची गरज ः डॉ. विलास भाले

चंद्रपूर ः कृषी विद्यापीठनिर्मिती तंत्रज्ञानाचा प्रसार होण्याकरिता कृषी विभाग व विद्यापीठाने समन्वय ठेवत एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. 

सिंदेवाही येथे पार पडलेल्या पूर्व विदर्भ विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या ७१ व्या सभेत ते बोलत होते. सहयोगी संशोधन संचालक डॉ. उषा डोंगरवार, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड यांची या वेळी उपस्थिती होती. 

डॉ. भाले पुढे म्हणाले, विद्यापीठाने रब्बी ज्वारी, हरभरा, जवस व उन्हाळी तीळ या पिकाच्या विकसित केलेल्या वाणाचा तसेच शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध, रेशीम, मधमाशीपालन या सारख्या पूरक उद्योगाचा अवलंब शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. 

रवींद्र भोसले यांनी पूर्व विदर्भातील पीक पद्धती व यावर्षी अनुकूल पर्जन्यमान असल्यामुळे रबी पीक लागवड क्षेत्र वाढ शक्‍य असल्याचे सांगितले. त्या दृष्टीने नियोजनाचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

सूत्रसंचालन डॉ. एस. एन. लोखंडे यांनी केले. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर डॉ. उदय पाटील, भंडारा येथील हिंदूराव चव्हाण, गोंदियाचे एन. व्ही. नयनवाड, गडचिरोलीचे अनंत पोटे, नागपूरचे मिलिंद शेडे आदि उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com