लोकसहभागातून जलसंवर्धन काळाची गरज ः प्रा. प्रशांत अवसरमल

लोकसहभागातून जलसंवर्धन काळाची गरज ः प्रा. प्रशांत अवसरमल
लोकसहभागातून जलसंवर्धन काळाची गरज ः प्रा. प्रशांत अवसरमल

फुलंब्री, जि. औरंगाबाद : धावणारे पाणी थांबवावे लागेल, थांबलेले पाणी जमिनीत जिरवावे लागेल. यासाठी पावसाळ्यात पडणारे पाणी नाला, ओढा, नदी यातून वाहून जाऊ न देता बांध घालून पाणी अडविणे आवश्‍यक आहे. लोकसहभागातून जलसंवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जलक्रांती ग्रुपचे प्रा. प्रशांत अवसरमल यांनी केले. 

फुलंब्री तालुक्‍यातील चिंचोली नकिब येथील विठ्ठल-रुख्मिणी मंडळाच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या जलजागृती एकदिवसीय चर्चासत्र व मार्गदर्शन शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. 

प्रा. अवसरमल म्हणाले, ‘‘जलसंवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेच आहे. येत्या उन्हाळ्यात पुढील वर्षासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या परिसरात पाणी अडविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. त्यासाठी जलक्रांती ग्रुप सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी जलक्रांती झाली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याची शाश्‍वती असली तर शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेणे शक्‍य आहे.’’ 

पाण्याची गरज काळाची या विषयावर पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक श्री. अस्लम बेग यांनी माहिती दिली. या प्रसंगी गणेश राऊत, सुभाष खिल्लारे, चंद्रभान पवार, संतोष जंगले, राजेंद्र वाढेकर, जुनेद शाह, योगेश गुंजाळ, मिनाज शाह, रामेश्वर पंडित, नितीन जंगले, सुनील सोनवणे, गणेश सोनवणे, पुंडलिक जंगले, पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com