नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या कालावधीत गारपीट, अवेळी पावसामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकाचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने नऊ कोटी ६८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी सहा तालुक्याला वितरित करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे - २०२० या कालावधीमध्ये गारपीट तसेच अवेळी पाऊस झाला होता. यामध्ये जिल्ह्यातील रब्बी व उन्हाळी शेतीपिकांसह बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाद्वारे शासनाला कळवला होता.
यात फेब्रुवारी व मार्च २०२० या कालावधीत नुकसान झालेल्यांना सात कोटी १५ लाख चार हजार ४९०, एप्रिलमध्ये नुकसान झालेल्यांना दोन कोटी ३२ लाख ६६ हजार ४१० रुपये तर मे २०२० मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चार लाख ७६ हजार शंभर रुपये मिळाले.
तालुकानिहाय प्राप्त निधी
नांदेड तालुक्यासाठी २१,६०० रुपये, कंधार तालुक्यासाठी २१ कोटी ४५ लाख ६०० रुपये, लोहा तालुक्यासाठी एक कोटी साठ लाख ७४० रुपये, बिलोली एक कोटी ६३ लाख ५० रुपये, मुखेड एक लाख ८५ हजार ७६० रुपये, हदगाव सात कोटी २५ लाख ४३ हजार ७५० रुपये, माहूर साडेचार हजार असा एकूण नऊ कोटी ६८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.