परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेनऊ लाख टनांवर उसाचे गाळप

परभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील सहा आणि हिंगोली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी सोमवार (ता.१४) पर्यंत ९ लाख ६१ हजार ९५८ टन उसाचे गाळप केले.
Nine and a half lakh tonnes of sugarcane crushed in Parbhani, Hingoli district
Nine and a half lakh tonnes of sugarcane crushed in Parbhani, Hingoli district

परभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील सहा आणि हिंगोली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी सोमवार (ता.१४) पर्यंत ९ लाख ६१ हजार ९५८ टन उसाचे गाळप केले. त्यांनी एकूण ७ लाख ९९ हजार ३० क्विंटल साखर उत्पादन घेतले.

परभणी जिल्ह्यातील सर्व सहा खासगी साखर  कारखान्यांचे ऊस गाळप सुरु आहे. कानडेखेड (ता.पूर्णा) येथील बळिराजा शुगर कारखान्याने १ लाख ६९ हजार ५५० टन ऊस गाळप, तर ९.४ टक्के उताऱ्याने ६९ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादन, देवनांद्रा (ता.पाथरी) येथील रेणुका शुगर कारखान्याने ६७ हजार ४२० टन उसाचे गाळप, तर ८.१७ टक्के  उताऱ्याने ५५ हजार ६६ क्विंटल साखर उत्पादन घेतले. लिंबा (ता.पाथरी) येथील योगेश्वरी शुगर्सने ४१ हजार ५२ टन ऊस गाळप केला. ७.१४ टक्के उताऱ्याने २९ हजार ३२० क्विंटल साखर काढली. 

आमडापूर (ता.परभणी) येथील त्रिधारा शुगर्सने १ लाख १० हजार २२० टन ऊस गाळप केले. ७.९३ टक्के उताऱ्याने ८७ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादन घेतले. सायखेडा (ता.सोनपेठ) येथील महाराष्ट्र शेतकरी शुगर कारखान्याने १ लाख ३८ हजार २५ टन गाळप, तर ९९ हजार ४५०  क्विंटल साखर उत्पादन, माखणी (ता.गंगाखेड) येथील गंगाखेड शुगर कारखान्याने ३४ हजार ३१० टन गाळप, १९ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. एकूण सहा कारखान्यांनी ५ लाख ९२ हजार ९९७ टन गाळप केले. सरासरी ८.०१ टक्के उताऱ्याने ४ लाख ७५ हजार ३० क्विंटल साखर काढली. 

हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा (ता.कळमनुरी) येथील भाऊराव चव्हाण कारखाना युनिट दोनने ६२ हजार ६२० टन गाळप, तर ५१ हजार ५५० क्विंटल साखर, वसमत येथील पूर्णा कारखान्याने १ लाख ९९० टन गाळप, १ लाख ९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले.

जवळा बाजार (ता.औंढा नागनाथ) येथील पूर्णा कारखाना युनिट दोन (बाराशिव हनुमान) ने ९३ हजार ७० टन गाळप, ८० हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन, शिरूर शुगर्सने १ लाख १ हजार २२१ टन गाळप, तर ९१ हजार ३५० क्विंटल साखर काढली. 

हिंगोलीत ३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन 

कुरुंदा (ता.वसमत) येथील टोकाई कारखान्याने २ हजार ६० टन ऊस गाळप केले. हिंगोली जिल्ह्यातील चार सहकारी साखर आणि एका खासगी कारखान्यांनी एकूण ३ लाख ६८ हजार ९६१ टन उसाचे  गाळप केले. सरासरी ८.७८ टक्के उताऱ्याने ३ लाख २४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com