नाशिक जिल्ह्यातील नऊ धरणे ‘ओव्हरप्लो’

नाशिक जिल्ह्यातील नऊ धरणे ‘ओव्हरप्लो’
नाशिक जिल्ह्यातील नऊ धरणे ‘ओव्हरप्लो’

नाशिक : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. त्याचा जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरण्यासाठी उपयोग झाला आहे. बुधवारपर्यंत (ता. २९) जिल्ह्यातील धरणांत सरासरी ७९ टक्के साठा झाला आहे. मागील वर्षी याच वेळी हा साठा ८१ टक्के होता. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत साठा ३ टक्‍क्‍यांनी कमीच आहे.

जिल्ह्यात २४ मध्यम व मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ६५,८१४ दशलक्ष घनफूट आहे. आतापर्यंत या धरणांत ५१,७८० दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त साठा झाला आहे. तो ७९ टक्के आहे. गतवर्षी २९ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील धरणांत ८१ टक्के म्हणजे ५३,९०२ दशलक्ष घनफूट इतका साठा होता. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाल्यास धरणसाठ्यात अजून वाढ होईल. अडचणीतील खरीप हंगामाला पावसामुळे जीवदान मिळाले आहे. धरणांतील उपयुक्त साठ्यामुळे उन्हाळ्यातील पिकांचे नियोजन करणे शक्‍य झाले आहे.

नाशिक व नगर जिल्ह्यासाठी महत्वाचे असलेले गंगापूर धरण ९२ टक्के भरले आहे. त्याच्या आतील बाजूस असलेले काश्‍यपी धरण ९९ टक्के भरले आहे. याबरोबरच गौतमी गोदावरी, आळंदी, वाघाड, दारणा, भावली, कडवा, भोजापूर, हरणबारी, केळझर ही नऊ धरणे १०० भरली असल्याने या धरणक्षेत्रातील शेतीच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com