यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांच्या नऊशे तक्रारी

यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू झाले आहे. यासोबत तक्रारीची संख्याही वाढत आहे. या तक्रारी जिल्हास्तरीय समितीपुढे ठेवल्या जाणार असून, त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
Nine hundred complaints of farmers for debt relief in Yavatmal district
Nine hundred complaints of farmers for debt relief in Yavatmal district

यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू झाले आहे. यासोबत तक्रारीची संख्याही वाढत आहे. आधार क्रमांक बदलणे, वारसाची नोंदणी, पुनर्गठन करताना सही नसणे, कर्जमाफीची रक्कम अशा स्वरूपाच्या जवळपास तक्रारी सहकार विभागाकडे आल्या आहेत. या तक्रारी जिल्हास्तरीय समितीपुढे ठेवल्या जाणार असून, त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन करण्यात आले होते. त्याचा परिणाम राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेवरही झाला आहे. अनेक महिन्यांपासून घोषणा होऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. खरीप हंगामाची पेरणी झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. आता ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शासकीय कामांनाही गती मिळाली आहे. कर्जमाफी योजनेचे काम सुरू झाले आहे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू झाले आहे. यासोबत शेतकऱ्यांच्या तक्रारीची संख्याही वाढत आहे.

कर्जमाफी संदर्भात आत्तापर्यंत जिल्हाभरातून आठशेच्यावर शेतकऱ्यांनी सहकार विभागाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बदलले आहेत. काहींच्या अर्जावर वारसाचे नाव नाही, तर ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले, अशांची सही त्यासाठी नाही. याशिवाय, काहींच्या रक्कमेत तफावत आहे. अशा नानाविध प्रकारच्या तक्रारी सहकार विभागाकडे येत आहेत. कर्जमुक्तीसाठी प्रमाणीकरणाचे काम वेगात सुरू आहे.

सद्यःस्थितीत केवळ नऊ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे. दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मदतीला सुरुवात होणार आहे. असे असले तरी ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. अशांची सुनावणी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीसमोर होणार आहे. याठिकाणी संबंधित शेतकऱ्यांना पुराव्यानिशी आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर दुरुस्ती होऊन संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. लवकरच जिल्हास्तरीय समितीची बैठक होणार असून कर्जमाफीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

जिल्हा बँकेची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता जिल्ह्याला ७४५ कोटींची कर्जमाफी झाली आहे. यातील ७१० कोटींचा निधी दिला जाणार आहे. सध्या जिल्ह्याला ३८९ कोटी रुपये प्राप्त झाले आहे.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिले आहेत. जिल्हा बँकेची प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित रक्कम इतर बँकांची असून त्यांची प्रक्रियाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com