नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५ मिमी पाऊस

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात असलेल्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५ मिमी पाऊस पडला. पावसाचा जिल्ह्यातील तब्बल ४२० गावांना चांगलाच फटका बसला आहे.
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५ मिमी पाऊस In the Nira Deoghar dam area Maximum rainfall of 255 mm
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५ मिमी पाऊस In the Nira Deoghar dam area Maximum rainfall of 255 mm

पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात असलेल्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५ मिमी पाऊस पडला. पावसाचा जिल्ह्यातील तब्बल ४२० गावांना चांगलाच फटका बसला आहे. मावळ, मुळशी आणि भोर तालुक्यातील १७६ कुटुंबातील ६०० व्यक्तींना स्थलांतर केले. तर सहा जनावरे व एक व्यक्तीचा  वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर ४० घरांचे नुकसान झाले असून, ९५ पोल २ रोहित्रांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दिवसभर पावसाने काहीशी उघडीप दिली होती.    गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढू लागला होता. मागील तीन ते चार दिवसांत पावसाने चांगलाच कहर केला. प्रामुख्याने पश्चिम भागात पावसाने चांगलीच दाणादाण उडवली. ताम्हिणी, लोणावळा परिसरात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ होत होती. शनिवारी (ता.२४) सकाळी आठवाजेपर्यत नीरा देवघर २५५, मुळशी २०१ मिलिमीटर पाऊस पडला. तर पानशेत १९३, टेमघर १९०, वरसगाव १८८, वडीवळे १८७, गुंजवणी १७३, कळमोडी १२४, पवना १२०, आंध्रा ९६, भाटघर ९२, भामा आसखेड ८१, कासारसाई ७०, खडकवासला ५८, पिंपळगावे जोगे ३८, चासकमान ३४, वीर २५, नाझरे १६, माणिकडोह २३, डिंभे ३२ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहिल्याने धरणात दोन ते तीन टीएमसीपर्यंत पाणीसाठ्यात वाढ झाली. खडकवासला १८,४९९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. नदीकाठावर सतर्क राहण्याचे आवाहन  नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस काहीसा कमी झाला आहे. मात्र लगतच्या जिल्ह्यांतील धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने, त्या धरणसाठ्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी, तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.  आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, नगर येथील दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ वा २३५६०४० वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. भीमा नदीत दौंड पूल येथे ६१,७११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com