पाटणा, बिहार : ‘नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत, आमच्या मनात त्याविषयी कोणताही संभ्रम नाही,’ असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.
बिहारमध्ये बुधवारी (ता. ११) पहाटेपर्यंत मत मोजणी सुरू होती. या मतमोजणीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडील एकूण १२५ जागा मिळल्या. भाजपला ७४, जेडीयूला ४३, विकासशील इन्सान पक्षाला ४ आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाला ४ जागांवर विजय मिळाला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. त्यात राजद ७५, काँग्रेसने १९, भाकपा-माले १२, सीपीएमने २ आणि सीपीआयने २
जागांवर विजय मिळविला. या शिवाय एआयएमआएमने ५, बहुजन समाज पक्षाने १, लोक जनशक्ती पक्षाने १ जागेवर विजय मिळवला आहे. अपक्षाने १ जागा जिंकली आहे. दरम्यान, एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने जास्त जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून चर्चा सुरू झाली होती. मात्र भाजप नेते सुशील मोदी यांनी या बाबत स्पष्टीकरण दिल्याने चर्चेला वळण मिळाले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.