राज्यात कृषी विषयक कामांना बंदी नाही : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : राज्यात कृषी विषयक कामांना बंदी नाही. शेतकरी-शेतमजुरांना शेतावर जाण्यासाठीही निर्बंध नाहीत. शेतमालवाहतुक थांबवलेली नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात कृषी विषयक कामांना बंदी नाही : मुख्यमंत्री ठाकरे
राज्यात कृषी विषयक कामांना बंदी नाही : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : राज्यात कृषी विषयक कामांना बंदी नाही. शेतकरी-शेतमजुरांना शेतावर जाण्यासाठीही निर्बंध नाहीत. शेतमालवाहतुक थांबवलेली नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. अजूनही सकाळी पुन्हा लोक गर्दी करत आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंसाठी बाहेर पडावे लागले, तरी आपल्याला आता गांभीर्य ठेवावे लागणार आहे. मी पोलिसांना देखील यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.  राज्य शासनाच्या विनंतीनुसार मंगळवार (ता.२४) रात्रीपासून देशांतर्गत विमान सेवा बंद होत आहे. गेल्या आठवड्यातच मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना कर व जीएसटी परतावा तारीख वाढवून देण्याची विनंती केली होती ती त्यांनी मान्य केल्याबद्दाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तर राज्यात कृषी विषयक कामांना बंदी नाही. तसेच शेतकरी शेतमजुरांना शेतावर जाण्यासाठी बंदी घातलेली नाही. शेतमालवाहतुक थांबवलेली नसल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मंगळवारी (ता.२४) मुख्यमंत्री ठाकरे राज्याला उद्देशुन संबोधित करत होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,‘‘अजूनही सकाळी पुन्हा लोक गर्दी करताहेत असे चित्र आहे. जीव्नाव्शाय्क वस्तू, औषधी, दुध ,भाजीपाला घेण्यासाठी बाहेर यावे लागणार आहे पण आपल्याला आता गांभीर्य ठेवावे लागणार आहे. मी पोलिसाना देखील यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी या वस्तूंसाठी नागरिक बाहेर पडत असतील तर पोलिसांनी देखील त्याची योग्य खातरजमा करून घ्यावी.''

''सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंची, शेतमाल, अन्नधान्याची वाहतूक, आणि संबंधित कामगार ने आण करणारी वाहने अडवली गेली नाही पाहिजे अशा सुचना मी दिल्या आहेत. मात्र अशा अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या संस्था, कंपन्यांनी आपल्या वाहनांवर कंपन्यांचे नाव ठळकपणे लावावे तसेच कोणत्या आवश्यक वस्तूची वाहतूक करीत आहोत ते त्यात स्पष्ट लिहावे. वाहनांतील त्यातील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असावीत. अत्यावश्यक सेवेतील किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी अडचण येत असेल तर पोलिसांच्या १०० क्रमांकावर कॉल करा,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

कालच पोलिसांनी काही लाख मास्क धाड टाकून पकडले त्यासाठी त्यांचे अभिनंदन, या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणीही साठेबजीची संधी घेऊ नये. जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचा आपल्याकडे पुरेसा साठा आहे. मी आजच अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यानाही सुचना दिल्या आहेत. अजिबात काळजी करू नका. अशा परिस्थितीत स्वयंसेवी संस्था, मंदिरे मदतीसाठी पुढे आले आहेत. लालबागच्या राजाने रक्तदान शिबिरे सुरु केले आहे तर शिर्डी, सिद्धीविनायक यांनी देखील आपापल्या परीने मदतीची तयारी दाखविली आहे. मदत करणाऱ्या संस्थाना कुठेही अडचण येऊ नये अशा सुचना मी दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडथळा येऊ नये अशा सुचना पोलिसांना दिल्या आहेत. हा महत्वाचा टप्पा आपण सर्वांच्या सहकार्याने पार पाडूया, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com