चर्चा निष्फळ; स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन सुरु

चर्चा निष्फळ; स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन सुरु
चर्चा निष्फळ; स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन सुरु

पुणे :  उसाला एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी साखर आयुक्त आणि स्वाभिमानीच्या शिष्टमंडळात सुरु असलेली चर्चा निष्फळ ठरली आहे. आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले असेल, तरी एकरकमी एफआरपी मागणीवर आंदोलक ठाम आहेेत. चर्चा फिस्कटल्यांनतर आंदोलकांनी साखर संकूल परिसरातच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.  दरम्यान, केवळ आश्वासन नाही तर निर्णय झाल्याशिवाय माघार नाही असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला आहे. ऊसाच्या एफआरपीची तोडमोड न करता एकरकमी देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाला सोमवारी (ता.२८) अलका टॉकीज चौकातुन प्रारंभ झाला होता. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, स्वराज अभियानचे योगेंद्र यादव, रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या मोर्चात राज्याच्या विविध भागागतुन शेतकरी सहभागी झाले.

हल्लाबोल मोर्चा साखर संकूल परिसरात येताच पोलिसांनी तो अडविला. यानंतर स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली.  श्री. गायकवाड यांच्याबरोबर चर्चा सुरु केली. 

मोर्चा साखर आयुक्तालयावर मोर्चा धडकल्यानंतर मागण्या पुर्ण होई पर्यंत आंदोलक शेतकरी हटणार नसल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. मोर्चाला सकाळपासून राज्याच्या विविध भागातुन शेतकरी मोठ्या संख्येने पुण्यात दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी घरुन आणलेली शिदोरी खाऊन मोर्चात सहभागी झाले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत प्रतिकात्मक आसूड ओढला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com