जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
काही ठिकाणी हलक्या सरी
निवार चक्रिवादळ निवळत असताना जमिनीवरून अरबीसमुद्राकडे सरकत आहे. याचा परिणाम राज्याच्या काही भागावर झाला आहे.
पुणे : निवार चक्रिवादळ निवळत असताना जमिनीवरून अरबीसमुद्राकडे सरकत आहे. याचा परिणाम राज्याच्या काही भागावर झाला आहे. यामुळे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात तुरळक सरी पडल्या. याचा परिणाम रब्बीतील पिके व फळाबागांवर होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
कर्नाटक व तमिळनाडूच्या किनारपट्टीवरून निवार चक्रिवादळ जमिनीवर आले आहे. त्यानंतर वारे हळूहळू पश्चिमेकडे अरबी समुद्राच्या दिशेने सरकत असताना त्याची तिव्रता कमी होत आहे. राज्याच्या दक्षिणेकडील सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, कोल्हापूर या भागासह विदर्भात व कोकणात हे वाहत असल्याने शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी सकाळी काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
सध्या दक्षिण भारताच्या पूर्व भागात चक्रिवादळाची साखळी तयार होत आहे. निवार चक्रिवादळाची तिव्रता कमी होत नाही तोच पुन्हा कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती होत आहे. आज (ता.२९) हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकत असताना त्याचे चक्रिवादळामध्ये रंपातर होण्याची शक्यता आहे. तर आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याजवळ पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून हिंद महासागर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत चक्रिय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे.
आज (रविवारी) या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्याची तिव्रता वाढत जाणार असून २ डिसेंबरच्या दरम्यान तमिळनाडू किनारपट्टीच्या जवळ धडकण्याची शक्यता आहे. ते निवळून अरबी समुद्राच्यादिशेने जात नाही, तोच पुन्हा बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे.
कोरडे हवामान राहणार
निवार चक्रिवादळामुळे राज्यातील काही भागांत हवामानात बदल झाले आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील काही भागात थंडी कमी झाली असून तुरळक ठिकाणी काही प्रमाणात गारठा कमी झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असले
तरी थंडी कमीअधिक स्वरूपात राहणार आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली आहे. शनिवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यत महाबळेश्वर येथे १३.९ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
या पिकांवर होणार परिणाम
पीके ः रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, तूर,
फळबागा ः द्राक्षे, डाळीब, अंजीर
भाजीपाला पिके ः कांदा, काढणीला आलेल्या पालेभाज्या
शुक्रवारी (ता.२७) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअस) ः मुंबई (सांताक्रुझ) २३.२ (३), अलिबाग २२.० (२), ठाणे २३.२, रत्नागिरी २३.७ (३), डहाणू २०.४ (१), पुणे १९.३ (७), जळगाव १६.३ (३), कोल्हापूर १८.० (२), महाबळेश्वर १३.९, मालेगाव १६.८ (४), नाशिक १७.२ (५), निफाड १६.०, सांगली १८.६ (३), सातारा १९.२ (४), सोलापूर १९.६ (३), औरंगाबाद १८.५ (५), बीड १५.९ (१), परभणी १७.४ (३), परभणी कृषी विद्यापीठ १७.८, नांदेड १९.० (५), उ्स्मानाबाद १५.० (१), अकोला १६.८ (१), अमरावती १५.१ (-२), बुलडाणा १५.८, चंद्रपूर १७.६ (३), गोंदिया १६.० (१), नागपूर १६.५ (२), वर्धा १६.४ (१), यवतमाळ १६.५ (१)
- 1 of 653
- ››