तुरळक ठिकाणी हलक्या सरी 

पूर्वमोसमी पावसाचा काहीसा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस रखडलेल्या शेतीकामांना पुन्हा काही प्रमाणात सुरुवात झाली आहे.
rain
rain

पुणे : पूर्वमोसमी पावसाचा काहीसा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस रखडलेल्या शेतीकामांना पुन्हा काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. नाशिक, पुणे, नगर, जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने शेतकरी चांगलाच हातघाईस आला आहे.  गेल्या आठवडाभर मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे कांदा, द्राक्षे, आंबा, कलिंगड, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे अजूनही झाले नसले, तरी तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे. परंतु वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे पंचनामे करण्यात अडथळे येत आहेत. तसेच पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे न झाल्यास नुकसान भरपाईपासून अनेक शेतकरी वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.  विदर्भात व कोकणात काही प्रमाणात आकाश निरभ्र असले, तरी तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चांगलेच चिंतेत आहे.  शेतकऱ्यांची धावपळ  पूर्वमोसमी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडवली आहे. दिवसभर उन्हाचा चटका तर दुपारनंतर वादळ, वेगाने वाहणारे वारे, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने काढणी केलेला कांदा, कलिंगड, गहू झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील पश्‍चिम भागात वादळी वारा व जोरदार पाऊस झाला. यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले असून उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com