सांगली जिल्ह्यातील पाच कारखान्यांना नोटिसा

सांगली जिल्ह्यातील पाच कारखान्यांना नोटिसा
सांगली जिल्ह्यातील पाच कारखान्यांना नोटिसा

सांगली ः गाळप हंगाम सन २०१८-१९ मध्ये गाळप झालेल्या उसाला एफआरपीची रक्कम १४ दिवसांत दिली नसल्याने सांगली जिल्ह्यातील पाच कारखान्यांवर महसूल वसुलीअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित तहसीलदारांना दिले. 

कारवाईचे आदेश दिलेल्या कारखान्यांमध्ये केन ॲग्रो (रायगाव), श्री महांकाली (कवठेमहांकाळ), विश्‍वासराव नाईक (शिराळा), श्री दत्त इंडिया (सांगली), व निनाईदेवी (कोकरूड) या कारखान्यांचा समावेश आहे. महसूल विभागाचे तहसीलदार योगेश खरमाटे यांनी याबाबत आदेश दिले. 

जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी २०० कोटी ६६ लाख ६४ हजार रुपये थकवले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या या आदेशामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

जिल्हाधिकारी व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला हे आदेश मिळाले असून, ज्या-त्या तालुक्‍यातील तहसीलदारांकडून जप्तीची कारवाई होईल. सांगली जिल्ह्यातील विश्‍वासराव नाईक (शिराळा), केन ॲग्रो (रायगाव), निनाईदेवी-दालमिया (कोकरूड), श्री महांकाली (कवठेमहांकाळ), दत्त इंडिया (सांगली) या कारखान्यांवर जप्ती आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील थकीत एफआरपी नोटीस दिलेले कारखाने 
कारखाना थकीत एफआरपी रक्कम 
विश्‍वासराव नाईक ५८ कोटी  
केन ॲग्रो ३३ कोटी ५३ लाख 
निनाईदेवी-दालमिया ३१ कोटी २३ लाख
श्री महांकाली १५ कोटी ८६ लाख 
श्री दत्त इंडिया ६२ कोटी ०५ लाख 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com