राज्यात शेतीपंपासाठीच्या वीज दरात एक टक्के कपात 

मुंबई : नेहमीच वीज दरवाढीचा बोजा सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला राज्य वीज नियामक आयोगाने सोमवारी (ता. ३०) वीज दरात कपात करून सुखद धक्का दिला. यामुळे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेचे दर ५ ते ७ टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर शेतीसाठीचे वीज दर १ टक्क्यांनी कमी होणार आहेत.
One per cent reduction in electricity tariff for agricultural pumps in the state
One per cent reduction in electricity tariff for agricultural pumps in the state

मुंबई : नेहमीच वीज दरवाढीचा बोजा सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला राज्य वीज नियामक आयोगाने सोमवारी (ता. ३०) वीज दरात कपात करून सुखद धक्का दिला. यामुळे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेचे दर ५ ते ७ टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर शेतीसाठीचे वीज दर १ टक्क्यांनी कमी होणार आहेत. 

आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी विजेचे दर कमी करण्याची घोषणा करताना सरकारी महावितरणसह टाटा, अदानी या खासगी वीज कंपन्यांना शॉक दिला आहे. आयोगाने जाहीर केलेले नवे वीज दर येत्या १ एप्रिलपासून लागू होतील. वीज नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी ७ ते ८ टक्के कपात सुचविली आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सोमवारी ही कपात जाहीर केली. 

आयोगाच्या निर्णयानुसार मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर ७ ते ८ टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर ८ ते ९ टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर १ ते २ टक्क्यांनी कमी होतील. मुंबईत बऱ्याच मोठ्या भागात टाटा आणि अदानी या खासगी कंपन्या वीज वितरण करतात. त्यांच्यासाठीही आयोगाने वीज दर कपात सुचविली आहे. त्यानुसार या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर १८ ते २० टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर १९ ते २० टक्क्यांनी आणि घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल १० ते ११ टक्क्यांनी कमी होणार आहेत. त्यामुळे मुंबईत पश्चिम उपनगरातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

या निर्णयानुसार मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेचे दर ५ ते ७ टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर शेतीसाठीचे वीज दर १ टक्क्यांनी कमी होणार आहेत. ही दर कपात केवळ पुढच्या वर्षापुरती लागू राहणार नाही तर आयोगाने अशा प्रकारे इनबिल्ट पद्धत तयार केली आहे की त्यानुसार ते दर येत्या ५ वर्षापर्यंत लागू राहतील. या निर्णयामुळे सरकारला कोणताही आर्थिक भार पडणार नाही. वीज वितरण कंपन्या अधिक व्यावसायिक पद्धतीने चालवून कमी दरामध्ये ग्राहकांना वीज पुरवण्यास सक्षम असतील, असे श्री. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. 

घेतलेले महत्त्वाचे निर्णय 

  • मुंबई वगळता उर्वरित भागातील दर कपात 
  • औद्योगिक वीज दर १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार 
  • घरगुती वापराच्या वीज दरात ५ ते ७ टक्के घट 
  • 'गेल्या १५ वर्षात प्रथमच अशा प्रकारे वीज दरात कपात होत असून यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळेल. वीज दर कपातीमुळे उद्योग-व्यवसाय पुन्हा नव्याने उभारी घेण्यास सज्ज होतील'  - आनंद कुलकर्णी,  अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com