सांगली ः ‘पंतप्रधान किसान सन्मान’ योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. लाभार्थी यादीच्या सोशल ऑडिटमध्ये सापडलेले आणि आयकर भरणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १४ हजार २६७ शेतकऱ्यांकडून ११ कोटी ३५ लाख रक्कम वसुल होणार आहे. पहिल्या टप्प्यात वसुली आणि दुसऱ्या टप्प्यात कारवाई, असे नियोजन आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यापर्यंत १ कोटी १८ लाख ९६ हजार रुपये वसुल झाले.
जिल्ह्यात ‘पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेंतर्गत ४ लाख ५८ हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली. १४ हजार २६७ अपात्र लाभार्थ्यांची लाभ घेतला. एक हजार ६६० अपात्र लाभार्थी व १२ हजार ६०७ आयकर भरणाऱ्यांची यादी शासनाकडून पोर्टलवर मिळाल्याचे स्पष्ट झाले. योजनेंतर्गत एक हजार ६६० अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यांवर ८९ लाख ५४ हजार तसेच १२ हजार ६०७ आयकर भरणाऱ्यांच्या खात्यांवर १० कोटी ४६ लाख ६ हजार रुपये रक्कम जमा झाली आहे.
ही योजना राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून सुरु आहे. दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी कुटुंब लाभार्थी आहेत. प्रतिवर्ष सहा हजार रुपये (दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात) दिली जाते. या योजनेत यादीच्या सोशल ऑडिटमध्ये स्पष्ट झालेल्या आणि आयकर भरणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यानुसार वसुलीचे काम सुरू आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांमध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तींनी लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून वसूल होईल. संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. बॅंक खात्यांत तातडीने रक्कम जमा करण्याच्या सूचना संबंधित अपात्र लाभार्थ्यांना दिल्या आहेत. - डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी.
अशी परत घेणार रक्कम
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.