नगर ः जिल्ह्यात यंदा ही कांदा लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. कांद्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. कांदा लागवड क्षेत्र यंदाही वाढत आहे. आतापर्यंत रब्बीत सुमारे ५० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात कांदा उत्पादनाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. अगदी उसाच्या पट्ट्यात देखील कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे बाजार समितीत सातत्याने कांद्याची मोठी आवक होत असते. खास करून रब्बी उन्हाळी कांदा लागवडीचे क्षेत्र अधिक आहे. गेल्यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांची कांदा बियाण्यात फसवणूक झाले. कृषी विभागाने त्यावर कसलीही उपाययोजना केली नाही. जाणीवपूर्वक बोगस अभियानाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सोसावा लागला.
कांद्याला सरासरी २० ते २५ रुपयांपर्यंत दर स्थिर आहेत. त्यामुळे यंदाही चांगला दर मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले आहे. यंदा खरिपात साधारण २७ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. तर आता रब्बीमध्ये आतापर्यंत सुमारे ५० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे.
गेल्या वर्षी सुमारे दीड लाख हेक्टरवर कांद्याचे उत्पादन घेतले होते. यंदा चांगल्या पावसामुळे बहुतांशी भागात मुबलक पाणी आहे. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याचे उत्पादन घेतले जाण्याची शक्यता आहे. नगर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यात कांद्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.