कांदा निर्यातीस १५ मार्चपासून परवानी : केंद्रीय मंत्री पीयुष गोयल

कांदा निर्यातीस १५ मार्चपासून परवानी : केंद्रीय मंत्री पीयुष गोयल
कांदा निर्यातीस १५ मार्चपासून परवानी : केंद्रीय मंत्री पीयुष गोयल

पुणे : केंद्र सरकारने लागू केलेली कांदा निर्यातबंदी अखेर उठविली जाणार आहे. १५ मार्चपासून कांदा निर्यातीस परवानगी दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटर द्वारे दिली आहे. मात्र याही वेळेस किमान निर्यात मूल्याबाबत कोणतीही स्पष्टता मंत्री गोयल यांनी केलेली नाही. निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत आज (ता.२) शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून जोरदार आंदोलन केले होते.  

केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यात आल्याची माहिती २६ फेब्रुवारीस दिली होती. मात्र, यासंदर्भातील परिपत्रक काढण्यात आले नव्हते. चार दिवस झाले, तरी परिपत्रक निघत नसल्यामुळे कांदा निर्यातदार, व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांत प्रचंड रोष होता. आज (ता.२) लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू झाले तेव्हा कमी दर निघाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. याचे पडसाद जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांत उमटले. परिणामी जवळपास जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत लिलाव काही काळ बंद होते. तसेच जोपर्यंत निर्यातबंदी हटविण्यात येणार नाही, तोपर्यंत लिलाव न करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला होता.

अखेर पीयूष गोयल यांनी आज ट्वीटर द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला, मात्र किमान निर्यात मूल्य (एमइपी) बाबत यात उल्लेख करण्यात आलेला नाही. एमइपी सध्या ८५० डॉलर आहे, ती हटविण्याची मागणीही व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनीही केली आहे. यासंदर्भातील परिपत्रक आता १५ मार्चला निघणार असल्याने यानंतरच याबाबत खुलासा होऊ शकणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com