सातारा: जिल्ह्यात रब्बीत सुमारे दहा हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. सध्या कांदा काढणीस वेग आला असून सर्वत्र कांदा काढणी व छाटणीच्या कामात शेतकरी व्यस्त झाले आहेत. या हंगामात कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याने उत्पादनात वाढ होणार असून सध्या मिळत असलेल्या दराने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा हे प्रमुख पीक असल्याने या तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पश्चिमेकडील सातारा, कऱ्हाड, जावळी, वाई तालुक्यातही कांदा लागवड कमी अधिक प्रमाणात केली जाते. कधी नव्हे ते कांद्याचे दर शंभरावर गेल्याने कांदा पीक करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यातच दुष्काळी तालुक्यात जलसंधारण कामात दमदार पावसामुळे पाणी साचले होते. यामुळे या तालुक्यात पाण्याची उलब्धतता झाल्याने रब्बी हंगामात जिल्ह्यात दहा हजारावर हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. सातारा, कऱ्हाड, वाई, कोरेगाव तालुक्यात उसातही आंतरपीक म्हणून कांदा लागवड झाली. सध्या भर उन्हात कांद्याची काढणी वेगात सुरू आहे. कांदा काढणीस मजुरांची टंचाई भासत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. माण, खटाव, फलटण तालुक्यात क्षेत्र जास्त असल्याने या तालुक्यात कांदा काढणी व छाटणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कांद्याच्या क्षेत्रात झालेल्या वाढीमुळे उत्पादनातही वाढ होणार आहे. मात्र कांदा काढणीच्या काळात नेमकी दरात घट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र गतवर्षीप्रमाणे यावर्षीही चांगल्या दराची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांकडून कांदा ठेवला जाण्याची शक्यता अधिक आहे. कांदा साठवण करताना ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.