नगर जिल्ह्यात कांदा लागवड रखडली

आठवडाभरात समाधानकारक पाऊस झाल्यास यंदा कर्जत तालुक्‍यात कांद्याचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पुढील लागवडी कराव्यात. - दीपक सुपेकर, तालुका कृषी अधिकारी कर्जत.
नगर जिल्ह्यात कांदा लागवड रखडली

नगर  ः जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा खरिपातील कांदा लागवड रखडली आहे. आतापर्यंत २० हजार ५०५ हेक्‍टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपेही जळू लागली आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्केही लागवड झालेली नाही असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

जिल्ह्यामध्ये सरासरी ३० ते ४० हजार हेक्‍टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते. मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने मोठ्या दामाने शेतकऱ्यांनी चालू खरिपासाठी बियाणे खरेदी केले. जूनच्या सुरवातीला तालुक्‍यात चांगला पाऊस झाला. त्या ओलीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची रोपे लावली.

यंदा मोठ्या प्रमाणात लागवड होण्याचा अंदाज होता, मात्र सुरवातीपासूनच चांगला पाऊस नाही. जवळपास वीस दिवसांपासून तर पाऊस पूर्णतः गायब झाला आहे. त्यामुळे पिके वाया जाण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी लाल कांद्याची रोपे शेतात पाण्याअभावी लागवडीसाठी उभी आहेत. शेतकरी या रोपांना थोड्या पाण्यावर कसेबसे जगवत आहेत. जिरायत पट्ट्यात स्थिती गंभीर झाली आहे. लागवड कालावधी संपत आला असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com