निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात स्वागत; दरातही सुधारणा

केंद्र सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये कांदा निर्यात शुल्क ८५० डॉलर केल. त्यानंतरही काही जाचक अटी लावल्या होत्या. आता निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला. निर्यातखुली करण्याची घोषणा असली तरीही नियम, अटी, निर्यात शुल्क ह्याविषयी काहीच खुलासा नाही. त्यामुळे ‘तुमच्या समोर लाडू, पेढे ठेवले पण तुमचे हात बाधून ठेवले आणि सांगतात खा,’ अशातला हा प्रकार आहे. — संजय साठे, कांदा उत्पादक,नैताळे, ता. निफाड
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात स्वागत; दरातही सुधारणा
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात स्वागत; दरातही सुधारणा

नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातबंदी उठविण्यात आल्याची माहिती बुधवारी (ता.२६) ट्विटरद्वारे दिल्यानंतर गुरुवारी बाजार दरात सुधारणा झाली. लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा दरात ३९१ रुपयांनी वाढ होऊन कमाल भाव २३९१ रुपयांपर्यंत पोचले. अद्याप निर्यातबंदी, एमईपी आदींबाबत स्पष्ट परिपत्रक न आल्याने व्यापाऱ्यांची सावध भूमिका होती, मात्र या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात आले.   जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा खराब होऊन उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यानंतर हळूहळू आवकेत घट होऊन दर वाढले होते. त्यामुळे केंद्र सरकारने दर नियंत्रणात आणण्यासाठी निर्यातबंदीसह विविध उपाय केले होते. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून कांदा आवक वाढल्याने दरात घसरण होऊन शेतकरी अडचणीत आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी आणि कांदा साठवणुकीची मर्यादा रद्द करण्याची मागणी विविध शेतकरी संघटना व नेत्यांनी केंद्राकडे केली होती. अखेर केंद्रीय मंत्री पासवान यांनी देशात कांद्याचे वाढते उत्पादन व दरातील घसरण बघून निर्यातबंदी हटविण्याची घोषणा केली.  मागील वर्षाच्या मार्च महिन्यात २८.४ लाख टन उत्पादन होते, तर यावर्षी ४० लाख टन उत्पादनांचा त्यांनी अंदाज व्यक्त करून हा निर्णय जाहीर केला आहे. मात्र ही नुसतीच घोषणा ठरू नये, त्याची कार्यवाही तात्काळ व्हावी व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.  घोषणेबाबत संभ्रम कायम  केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केली आहे. मात्र, निर्यातीसंबंधीची जबाबदारी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडे आहे. अजूनही त्यांच्याकडून अधिकृत परिपत्रक गुरूवारी सायंकाळपर्यंत काढण्यात आलेले नाही. त्यामुळे घोषणा केली असली तरी शासननिर्णय नसल्याने कांदा उत्पादक, व्यापारी व शेतकरी संघटनांमध्ये संभ्रम कायम आहे.  प्रतिक्रिया मंत्र्यांच्या या घोषणेचे स्वागत आहे. मात्र आता मुक्त व्यापार सुरू करण्यावर त्यांनी भर द्यावा. विना अट कांदा निर्यात होण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. ढासळलेले कांदा बाजार यानिमित्ताने सुरुळीत होतील. सहा महिन्यांपूर्वी गमावलेली बाजारपेठ पुन्हा गतिमान होईल व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. — मनोज जैन,  कांदा निर्यातदार, लासलगाव, ता. निफाड सरकार कांदा उत्पादकांच्या भावनांशी खेळ करतेय. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या ट्वीट नंतर कांदा निर्यातबंदी उठली असे वाटत असताना सरकारकडून याबद्दलचा कुठलाही अधिकृत जीआर निघालेला नाही. केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट असा निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा.  — भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com