कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण 

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री झाल्यानंतर २४ तासांच्या आत देयके अदा करणे व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे, अशी नियमावली बाजार समिती वेळोवेळी जाहीर करते.
onion
onion

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री झाल्यानंतर २४ तासांच्या आत देयके अदा करणे व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे, अशी नियमावली बाजार समिती वेळोवेळी जाहीर करते. मात्र प्रत्यक्षात व्यवहाराचे पैसे मागितल्यानंतर हुज्जत घालून शेतकऱ्याला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावर ही घटना घडली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, की येवला तालुक्यातील ममदापूर येथील कांदा उत्पादक शेतकरी अक्षय गुडघे सोमवारी (ता. २१) २२ क्विंटल ७० किलो उन्हाळ कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कांद्याचा लिलाव झाला. तो रामेश्‍वर अट्टल नामक व्यापाऱ्याने खरेदी केला. वजन करून कांदा खाली केल्यानंतर शेतकरी पैसे घेण्यासाठी गेला असता ‘‘आज पैसे मिळणार नाहीत, उद्या भेटतील’’, असे सांगितले. 

यावर शेतकरी कांदा व्यापारी अट्टल यांच्याकडे गेला. यावर संबंधित व्यापाऱ्याने हुज्जत घटली. ‘‘आता १५ दिवसांनंतर ये,’’ असे सांगून ‘‘तू का भांडला ते सांग,’’ असे म्हणत वाद वाढवला. शेतकऱ्याचे म्हणणे होते, की मी भांडलो नाही, मी नियमाप्रमाणे २४ तासांत पैसे दिले जावे, या मागणीसाठी बोललो, तसा बाजार समितीचा नियम आहे. असे सांगतच ‘‘बाजार समितीत जा, मला नियम शिकवू नको, आता पैसे देत नाही, काय करायचं ते कर,’’ अशा भाषेत बोलत संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱ्यास धक्काबुक्की करत सौदापट्टी फाडली. 

‘‘मला पैशांची गरज आहे’’ असे शेतकरी वारंवार सांगत होता. मात्र आज पैसे देणार नाही, या भूमिकेवर व्यापारी ठाम होता. शेतकरी पुन्हा बाहेर गेल्यानंतर त्यास येवला बस स्थानकाजवळ गाठून व्यापारी व त्याच्या कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचे शेतकऱ्याने सांगितले.  शेतकऱ्यांकडून ‘रास्ता रोको’  हा संतापजनक प्रकार समजताच परिसरातील कांदा उत्पादकांनी एकत्र येत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर नगर-मनमाड महामार्गावर तासभर ‘रास्ता रोको’ केले. उपस्थित कांदा उत्पादकांनी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. पोलिस येथे आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.   प्रतिक्रिया  बाजार समिती संचालक, पोलिस प्रशासन यांची हातमिळवणी आहे. व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. बाजार समिती प्रशासक मंडळ जबाबदारी झटकत आहे. सर्वच व्यापाऱ्यांची बाजू घेणार असेल तर शेतकऱ्यांनी कुणाकडे न्याय मागायचा. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासक मंडळ नेमले. मात्र शेतकऱ्यांना मारहाण होत असेल तर हे प्रशासक मंडळ बरखास्त करा.  - वाल्मीक सांगळे, जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना, नाशिक 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com