बोगस बियाण्यांमुळे कांद्याची उगवणच नाही

खरीप हंगामात तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी कांदा लागवड केली आहे. कालावधीच्या मानाने कांदा पिकाची वाढ कमी प्रमाणात असून, प्राथमिक दर्शनी नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबाबत कांदा बियाण्यांची व लागवड झालेल्या कांद्याची तपासणी करून अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठविणार आहे. - टी. एस. भोंडवे, शास्त्रज्ञ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर सध्या बाजारात कांद्याला सात ते आठ हजार क्विंटल भाव असून चार पैसे पदरात पडतील असे वाटत असतानाच कंपनीचे बोगस बियाणे निघाल्याने आमचे एकरी किमान सात लाखांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाचा अहवाल, बियाणे पावती व आवश्‍यक कागदपत्रांसह लवकरच जिल्हा ग्राहक मंचाकडे फसवणूक झालेले शेतकरी तक्रार दाखल करणार आहोत. - राजेंद्र दयानंद ढवण, शेतकरी, वडाळा, ता. उत्तर सोलापूर खरीप हंगामासाठी संबंधित कंपनीचे ६३० किलो बियाण्याची विक्री केली आहे. यामध्ये सध्या १७५ शेतकऱ्यांची बियाणे बोगस असल्याची तक्रार आहे. याबाबत संबंधित कंपनीच्या अधिकारी व प्रतिनिधीस याची माहिती कळविली आहे. तसेच कृषी विभागाकडूनही याबाबत तपासणी सुरू आहे. - उमेश नकाते,गुरुमाऊली कृषी सेवा केंद्र, वडाळा
Onions are not grown by bogus seeds
Onions are not grown by bogus seeds

वडाळा, जि. सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्‍यातील वडाळा, रानमसले, वांगी आदी परिसरातील सुमारे १७५ शेतकऱ्यांनी एका खासगी कंपनीच्या कांदा बियाणांची लागवड केली. पण त्याची उगवणच न झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान सोसण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे कांद्याचा  बाजारभाव तेजीत असताना, असा दुर्दैवी प्रसंग शेतकऱ्यांवर ओढावल्याने संबंधित कंपनीविरुद्ध ठोस कारवाईची मागणी होत आहे.

वडाळा येथील एका केंद्रातून वडाळा, पडसाळी, वांगी, केमवाडी, रानमसले आदी परिसरातील शेतकऱ्यांनी बंगळूर स्थित एका हायब्रीड कंपनीचे कांदा बियाणे खरेदी केले होते. शेतकऱ्यांनी कांदा लागवड करून अडीच ते तीन महिने उलटले, तरी कांद्याची वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी दुकानदार आणि संबंधित कंपनीकडे धाव घेतली. पण, अद्याप तरी त्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीकडे धाव  घेतली. 

दोन दिवसांपूर्वी कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ टी. एस. भोंडवे, ‘‘महाबीज’चे प्रतिनिधी अतुल गेडाम, तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य, तसेच समितीचे अध्यक्ष, उपविभागीय कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी एस. के. होनमाने, के. एन. श्रावस्ती, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे आदींनी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली. त्या वेळी त्यांच्याही निदर्शनास बियाणातील दोष आले. पण नेमके हे कशामुळे झाले, याचा अभ्यास करून वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

दरम्यान, संबंधित कृषी केंद्रचालक, बियाणे कंपनी व प्रतिनिधी विरोधात कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी उत्तर सोलापूर तालुका कृषी विभागाकडे केली आहे. सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

सोलापूर बाजार समितीत कांद्याला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे. तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे चालू बाजारभावाप्रमाणे एकरी किमान सात लाख रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com