सांगली ः राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पीक पाहणी ॲपवर जिल्ह्यातील ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांपैकी केवळ आजअखेर अत्यल्प म्हणजे ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी, तर ६४ हजार शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केल्याचे स्पष्ट होत आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांत जागृती करण्यात कृषी व महसूल विभागातील समन्वयाचा अभावही अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
राज्य सरकारने ई-पीक पाहणी अॅप विकसित केले आहे. त्यामध्ये शेतकरी स्वत: आपल्या ७/१२ वर पिकांची नोंदणी करता येते. पिकांच्या नोंदणीसाठी चावडीमध्ये जाण्याचे हेलपाटे वाचणार आहेत.
‘माझा सात-बारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा,’ ही घोषणा करीत योजना १४ ऑगस्ट रोजी सुरवात झाली. राज्य शासनाने १५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. सरकारने पुन्हा ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत तरी नोंदणी पूर्ण क्षमतेने व्हावी, यासाठी कृषी, महसूलला प्रयत्न करावे लागतील.
जिल्ह्यातील नोंदणीची आकडेवारी पाहता छोट्या तालुक्याचे काम चांगले आहे. तर मोठ्या तालुक्यात अतिशय धिम्या गतीने काम सुरू असल्याचे स्पष्ट होते. मिरज, जत, वाळवा तालुके मोठे असताना नोंदणी कमी दिसते आहे. कडेगाव, आटपाडी, पलूस तालुक्यांचे काम चांगले झाले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.