शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ चार ते पाच मिनिटांचा संवाद साधत पूरग्रस्तांची निराशा केली. पद्माराजे विद्यालयात मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी शुक्रवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजल्यापासून जमलेल्या पूरग्रस्तांकडून केवळ चार ते पाच मिनिटांत माहिती घेतली. त्यानंतर तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकडे प्रयाण केले. त्यामुळे शेकडो पूरग्रस्तांची निराशा झाली. केवळ मोजक्याच पूरग्रस्तांशी पाच मिनिटांचा संवाद साधून ते निघून गेले. गावांनी पुनर्वसनाचा ठराव करून द्यावा शासन तो मंजूर करेल, असे आश्वासन दिले, दर वर्षी असे तात्पुरते स्थलांतर करणे आणि आम्ही तुम्हाला भेटणे, असे अपेक्षित नसल्याचे सांगत ठाकरे यांनी संवाद थांबविला आणि कोल्हापूरकडे प्रयाण केले. अनेक पूरग्रस्तांच्या बरोबरच काही संस्थाचे प्रतिनिधीही पूर येण्याची नेमकी कारणे व ठोस उपाय या बाबत मुख्यमंत्र्यांशी काहीकाळ चर्चा करण्यास उत्सुक होते, परंतु मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याबरोबर बरोबर असणाऱ्या शेकडो पोलिसांचा व अनेक कार्यकर्त्यांचा भरणा असल्याने मूळ मुद्द्यावर चर्चा झालीच नाही. अनेक पूरग्रस्त काहीतरी सांगण्याच्या मानसिकतेत होते, त्यांना व्यथा मांडायच्या होत्या, परंतु पोलिसांची ढकलाढकली व व प्रोटोकॉलच्या प्रभावामुळे मुख्यमंत्र्याशी संवाद होऊ शकला नाही. ही भेट म्हणजे केवळ एक इव्हेंट बनला. पूरग्रस्तांची संवाद साधताना माईकची सोय करण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नाही. गोंधळात त्यांचा संवाद ही लोकांना समजला नाही. केवळ एक दोन प्रश्न विचारण्यासाठी मुख्यमंत्री येथे आले होते का? असा संतप्त सवाल पूरग्रस्तांनी केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.