जिरायतीत ज्वारीचे एकरी दोन क्विंटल उत्पादन 

पावसाळ्याच्या शेवटी झालेल्या जोरदार पावसाने उशिराने झालेली पेरणी आणि त्यानंतरही सातत्याने बदलत्या वातावरणामुळे झालेल्या विविध रोगांच्या प्रादुर्भावाचा ज्वारी उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
jowar
jowar

नगर ः पावसाळ्याच्या शेवटी झालेल्या जोरदार पावसाने उशिराने झालेली पेरणी आणि त्यानंतरही सातत्याने बदलत्या वातावरणामुळे झालेल्या विविध रोगांच्या प्रादुर्भावाचा ज्वारी उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगातून आलेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात जिरायती भागात हेक्टरी सरासरी ४८० किलो, तर बागायती भागात हेक्टरी ८४३ किलो उत्पादन निघाले आहे. त्यामुळे यंदा रब्‍बीतील चांगली स्थिती असून, ज्वारीचे उत्पादन तोट्यातच गेल्याचे दिसत आहे. 

नगर जिल्ह्याच्या शेजारील ज्वारीचे आगार असलेल्या सोलापूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांमधील काही भागाचा अपवाद वगळला तर त्या भागातील उत्पादनाची स्थितीही अशीच आहे. 

नगर जिल्ह्यातील नगर, पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डीसह अन्य तालुक्यांत रब्बी ज्वारीचे क्षेत्र अधिक असते. जिल्ह्यात सरासरी पावणेपाच लाख हेक्टर क्षेत्र आहे. यंदा पावसाळ्याच्या शेवटी पंधरा दिवस सलग जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ज्वारीची वेळेत पेरणी करता आली नाही. त्यातच पेरणीनंतर लष्करी आळी, सतत बदलते आणि ढगाळ वातावरणामुळे मावा, तुडतुडे, चिकट्याचा मोठ्या प्रमाणात ज्वारीवर प्रादुर्भाव झाला. त्यामुळे दाणे पुरेशा प्रमाणात भरले नाही तर भरलेले दाणे पोसली नाही. त्याचा परिणाम आता हाती आलेल्या उत्पादनावर दिसून येत आहे. 

कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगानुसार यंदा नगर जिल्ह्यात बागायती क्षेत्रात हेक्टरी सरासरी ८४३ किलोचे उत्पादन निघाले आहे. म्हणजे सरासरी एकरी साडेतीन ते चार क्विंटल उत्पादन निघाले आहे तर जिरायती क्षेत्रात हेक्टरी सरासरी ४८० किलो म्हणजे एकरी दोन क्विंटल उत्पादन निघाले आहे. जिरायती भागात जामखेड सर्वाधिक ७५८ किलो, कर्जत तालुक्यात सरासरी ५७२ किलो, पारनेर तालुक्यात ४१४ किलो, श्रीगोंद्यात पाथर्डी तालुक्यात ५२४ किलोचे उत्पादन निघाले आहे. यंदा रब्बी ज्वारीसाठी चांगले वातावरण असले तरीही ज्वारी तोट्यातच गेली आहे.  बीजोत्पादनाचे चांगले उत्पादन  नगर तालुक्यातील खारकर्जुने, निंबळक, निमगाव घाणा, निमगाव वाघा, देहरे आदी भागांतील शेतकरी अनेक वर्षांपासून ज्वारीचे रब्बीत बिजोत्पादन घेतात. हा भाग कोरडवाहू असून तेथे केवळ पावसाच्या पाण्यावरच बीजोत्पादन घेतले जाते. यंदा ज्वारीच्या उत्पादनात घट झाली असली तरी या भागात मात्र अन्य भागाच्या तुलनेत ज्वारीचे उत्पादन चांगले निघाले आहे. येथे यंदा एकरी सरासरी चार क्विंटलपर्यंत उत्पादन निघाले असल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com