अकोला : ‘केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तीन कृषी कायदे केले. परंतु शेतकरी हिताचे असलेल्या या कृषी कायद्यांच्या आडून विरोधक राजकारण करीत आहेत. देशात संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे,’ असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केला. नवी दिल्ली येथून त्यांनी ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. यात कृषी कायदे कसे शेतकरी हिताचे आहेत, या बाबत सरकारची मांडणी केली. संजय धोत्रे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पिकाचे विविधीकरण आणि नवीन बाजारपेठेची उपलब्धता आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात इको-सिस्टम तयार करण्यासाठी सरकारचे प्रयत्न, जिथे चांगल्या प्रतीचे सुधारित बियाणे, अस्सल खते उपलब्ध आहेत.``
आंदोलक हेका सोडण्यास तयार नाहीत शेतकऱ्यांना वेठीस धरून राजकारण करणाऱ्या विरोधकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासोबतच नाहक आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. या पासून सावध राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार कायद्यामध्ये बदल करण्याबाबतचे प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र, आंदोलन करणाऱ्या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत, असेही धोत्रे म्हणाले. . या संघटनांच्या नेत्यांना कृषी कायद्याच्या निमित्ताने केवळ राजकारण करायचे आहे, असे आरोपही मंत्री धोत्रे यांनी केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.