शेती व्यवसायाच्या प्राथमिक अवस्थेपासून तृणधान्यांचा आहार आणि एकंदरीतच पीक लागवडीत मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू आणि अवर्षण प्रवण विभागातील शेतकरी पारंपारिक पद्धतीने ज्वारी, बाजरी आणि इतर तृणधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. शेती व्यवसायाच्या प्राथमिक अवस्थेपासून तृणधान्यांचा आहार आणि एकंदरीतच पीक लागवडीत मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू आणि अवर्षण प्रवण विभागातील शेतकरी पारंपारिक पद्धतीने ज्वारी, बाजरी आणि इतर तृणधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. तृणधान्यांच्या पोषणमूल्यंविषयी पुरेशा माहिती अभावी उत्पादकांना आकर्षक बाजार भाव मिळत नाही. तरीदेखील पारंपारिक पद्धतीच्या लागवडीतील तृणधान्यांचा वाटा अद्यापही टिकून आहे. वैशिष्ट्ये महाराष्ट्र हे तृणधान्य पिकांचे कोठार समजले जाते. ज्वारी, बाजरी आणि इतर तृणधान्यांची लागवड महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. धुळे, जळगाव, नंदुरबार नगर, सोलापूर, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि कोकणपट्टीमध्ये स्थानिक तृणधान्यांची लागवड टिकून आहे. सर्व तृणधान्ये मुख्यतः कोरडवाहू पिके म्हणून घेतली जातात. तृणधान्य लागवडीमध्ये मुख्यतः छोटे आणि सीमांत शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मूल्यसाखळी विकसित करण्याची गरज तृणधान्यांचे उत्पादन आणि विक्री अद्यापही पारंपारिक पद्धतीनेच चालू आहे. या पिकांच्या बाजार भावाविषयी सांख्यिकी विश्लेषण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. पारंपारिक विक्री साखळीमध्ये अडतदार, व्यापाऱ्यांना धान्य विकले जाते. मूल्यवर्धन साखळी अद्यापही विकसित झालेली नाही. बाजारपेठांची स्थिती बहुतेक सर्व तालुकास्तरावरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये धान्य प्रतवारी, चाळणी, पॅकिंग सुविधा उपलब्ध आहेत.परंतु शेतकऱ्यांसाठी किफायतशीर दरामध्ये गोदामांमध्ये साठवणूक सुविधांची कमतरता आहे. गोदाम सुविधांच्या अभावी शेतमाल तारण पावती आणि त्याआधारे मिळणारा पतपुरवठा याचा लाभ उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही. तृणधान्य शेतीसमोरील आव्हाने बदलती जीवनशैली, आहार शैलीमध्ये पारंपारिक तृणधान्ये दुर्लक्षित राहिली आहेत. वास्तवात ही सर्व तृणधान्ये पोषणमूल्यदृष्ट्या आणि तंतुमय घटकांनी परिपूर्ण आहेत. असे असूनही गहू आणि तांदूळ यांच्या तुलनेत बाजारपेठेत ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या धान्यांचा मागणी आणि बाजार भाव देखील कमी आहे. सुधारित तंत्राचा अभाव, अपुऱ्या सिंचन सुविधा, निविष्ठांचा कमी वापर आणि मूल्यवर्धन साखळीचा अभाव या मुख्य समस्या आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी या सारख्या पिकांच्यामध्ये अद्याप कोणतीही मोठी उत्पादक कंपनी कार्यरत नाही. वैद्यकशास्त्राने या तृणधान्यांची पोषकता परिपूर्णता चाचण्यांच्या आधारे सिद्ध केली आहे. त्यामुळे येत्या काळात बाजारपेठेतील मागणी पाहता मूल्यवर्धन आणि विपणन साखळी उभारण्यास उत्पादक कंपन्यांना चांगली संधी आहे. संशोधन आणि विकास
संपर्क -विजयकुमार चोले, ९४२०४९६२६० (उपाध्यक्ष, सातारा मेगा फूड पार्क)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.