शेतकऱ्यांचा मुळातून पाणी सोडण्याला विरोध
शेतकऱ्यांचा मुळातून पाणी सोडण्याला विरोध

मुळा धरणातून पाणी सोडण्याला शेतकऱ्यांचा विरोध

नगर : मुळातून पाणी सोडण्याला राहुरी, नेवाशातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. गुरुवारी सकाळी अकरा वाजता सोनईत शेतकरी जमा झाले. त्यानंतर शेतकरी मुळा धरण परिसरात जाताना बारागाव नांदुर येथे शेतकऱ्यांना अडवले. शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.

दरम्यान ‘मराठवाड्यातील पुढारी नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी मिळविण्यासाठी पोटतिडकीने जोर लावत असताना जिल्ह्यातील पुढारी भविष्यातील राजकारणाचे गणित डोळ्यासमोर ठेवून पाणी सोडण्याला विरोध करत नाहीत. शेतकऱ्यांचा बळी देण्याचेच पाप केले जात आहे.’ अशी टीका माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली.

समन्यायी पाणी धोरणानुसार जायकवाडीला मुळा धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यास विरोध म्हणून व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोनईतील आमराई येथे शेतकरी जमा झाले होते.

या वेळी शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी भूमिका मांडली. ‘मुळातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर लाभक्षेत्रातील पाच तालुके ओसाड होतील. हक्काच्या पाण्यावर कुणी गदा आणणार असेल तर नेवासे तालुक्यातील शेतकरी जिवाची पर्वा न करता लढा देण्यास सज्ज आहेत’ असे सांगितले.

त्यानंतर उपस्थित सर्व शेतकरी घोषणा देत मुळा धरणाकडे पाणी सोडण्याला विरोध करण्यासाठी शेतकरी मुळा धरणाकडे गेले. मात्र, प्रशासनाने पोलिसांनी गाड्या बारागाव नांदुर येथे अडवले. त्यानंतर शेतकरी पायी मुळा धरणाकडे गेले. तेथेही माजी आमदार शंकरराव गडाख यांनी भाषण केले. उशिरापर्यंत शेतकरी धरणावर होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com