आरक्षण, शेती प्रश्नावर विरोधक आक्रमक

मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधी पक्ष भाजपने सोमवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. अपयश लपविण्यासाठी, चर्चा टाळण्यासाठी दोन दिवसांचेच अधिवेशन घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला.
आरक्षण, शेती प्रश्नावर विरोधक आक्रमक
आरक्षण, शेती प्रश्नावर विरोधक आक्रमक

मुंबई  : मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधी पक्ष भाजपने सोमवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. अपयश लपविण्यासाठी, चर्चा टाळण्यासाठी सरकारने दोन दिवसांचेच अधिवेशन घेतल्याचा आरोप विरोधकांनी  केला. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारच्या (ता. १४) पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे आक्रमक पवित्रा घेतला. मराठा आरक्षण लागू करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्या आदी मागण्यांचे फलक घेऊन भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. जनतेचे प्रश्न मांडता येऊ नयेत, शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्नच उपस्थित होऊ नये, यासाठी सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. मंत्र्यांच्या बंगल्यावर जरूर खर्च करा पण आधी शेतकऱ्यांना पैसा द्या, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. दिल्ली, अमेरिकेवर बोलल्याने राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यांना बांधावर जाऊन दिलेले आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी अद्याप पूर्ण केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर, मराठा, ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारविरोधात आम्ही आवाज बुलंद करू, असा इशाराही फडणवीसांनी दिला. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यासमोर मराठा आरक्षण, शेतकरी मदत, कोरोना असे अनेक प्रश्न असताना त्यावर चर्चाच करायची नाही म्हणून दोन दिवसाचे हिवाळी अधिवेशन ठेवल्याचा आरोप केला.

अध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही अधिवेशनाच्या कालावधीबाबत नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला परवडणार नाही. आमदारांना वेळ अपुरा पडतो. त्यांना प्रश्न मांडता येत नाहीत आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देता येत नाही, असे पटोले म्हणाले.  इतर राज्यांप्रमाणे आठ ते दहा दिवसांचे अधिवेशन घेतले जाऊ शकते. पुढील अधिवेशन नियमित होण्याची कार्यवाही करा, असेही पटोले म्हणाले.

विधानसभेत गदारोळ आज विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. मराठा आरक्षण आणि अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी  विरोधकांनी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार आणि विरोधी पक्षाने एकत्रित बैठक घेत नियमावली तयार करण्याचे आवाहन केले. कामकाजाला सुरुवात होण्याआधीच भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता असल्याचे सांगत अधिवेशन दोन दिवस ठेवल्याबद्दल संताप व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com