वाळूउपशास ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा विरोध

वाळूउपशास ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा विरोध
वाळूउपशास ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा विरोध

जळगाव : तापी व गिरणा नद्यांतून होणाऱ्या वाळूउपशास ग्रामस्थांसह काही राजकीय पक्षांनी जाहीर विरोध केला आहे. काही ठिकाणी ग्रामस्थांनी एकत्र येऊन उपसा बंद पाडला. यातच जिल्हा प्रशासनाकडून लिलाव प्रक्रिया सुरूच आहे. परंतु उपशासाठी फारसे दिवस शिल्लक नाहीत. वाळूचोरी सुसाट सुरू आहे. यामुळे लिलाव प्रक्रियेला फारसा प्रतिसादही मिळत नसल्याचे चित्र आहे. 

 वरखेडे (ता. चाळीसगाव) बॅरेज प्रकल्पाच्या कामावर निघत असलेल्या काही ब्रास वाळू चाळीसगाव पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी उचलण्यास अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार, वाळू घेण्यासाठी यंत्रणा आली. त्यांना ग्रामस्थांनी वाळू उचलू दिली नाही. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली. गिरणाकाठी सर्वच गावांमध्ये वाळूउपशास विरोध आहे. परंतु वाळूचोरी थांबली नसल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

जळगाव जिल्ह्यातील वाळूगटांचे लिलाव गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. यातील काही वाळूगटांचे लिलाव गेल्या महिन्यात झाले. परंतु, उर्वरित १६ पैकी केवळ २ दोन गटांचा लिलाव सोमवारी (ता. २५) झाला. निविदांना प्रतिसाद मिळत नाही. दुसरीकडे वाळूचोरीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगितले जात आहे.  

जिल्ह्यात तापी, गिरणा, सुकी, बोरी नद्यांतून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा केला जातो. या नद्यांमध्ये सुमारे २७ वाळूगट असून, गेल्या महिन्यात त्यापैकी ७ वाळूगटांचा लिलाव झाला. धुळे जिल्ह्यातही तापी नदीतून वाळूउपशासाठी मध्यंतरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला.

शिंदखेडा तालुक्‍यानजीक नदीतून हा वाळूउपसा प्रस्तावित आहे. वाळूचोरी, उपशामुळे कूपनलिका आटत आहेत. पर्यावरणाची हानी होत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com