शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली; काॅंग्रेसकडून निदर्शने

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी गुरुवारपासून जंतर-मंतरवर आंदोलनानंतर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ करून कामकाज बंद पाडले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली; काॅंग्रेसकडून निदर्शने
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली; काॅंग्रेसकडून निदर्शने

नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले. कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी गुरुवारपासून जंतर-मंतरवर आंदोलनानंतर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ करून कामकाज बंद पाडले.  आतापर्यंत दिल्लीच्या सीमेवर होणारे शेतकऱ्यांचे आंदोलन आता संसदेपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर येऊन पोहोचले आहे. केंद्र सरकारचे सुधारित कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील सात महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा असून, राष्ट्रपतींना निवेदन देण्यापासून ते संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यापर्यंतची ग्वाही विरोधी पक्षांनी शेतकरी संघटनांना दिली आहे.  त्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी कृषी कायद्यांविरोधात लोकसभेमध्ये स्थगन प्रस्ताव दिला होता. तर आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनीही स्थगन प्रस्ताव मांडला होता. तर काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी पेगॅसस प्रकरणात चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला होता.  राज्यसभेमध्येही अशाच प्रकारच्या गोंधळाची पुनरावृत्ती झाली. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या जोरदार घोषणाबाजीमध्ये अत्यावशक संरक्षण सेवा आणि आंतरदेशीय नौकावाहतूक विधेयक मांडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत लोकसभेचे कामकाज पुन्हा दुपारी दोनपर्यंत तहकूब करावे लागले. सकाळी अकराला कामकाज सुरू होताच काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गोंधळातच प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. मात्र ‘काळे कायदे रद्द करा’ अशा घोषणा देत काँग्रेस खासदारांनी कामकाजात अडथळे आणले. तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अन्नदात्याचा अपमान बंद करा, असे घोषणा फलकही विरोधकांनी या वेळी सभागृहात झळकावले. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार आवाहन करूनही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्याने अखेर त्यांनी दुपारी बारापर्यंत कामकाज तहकूब केले. राहुल गांधींच्या नेतृत्वात हल्लाबोल सभागृह सुरू होण्याआधी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमधील खासदारांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली संसदेच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर कृषी कायद्यांविरोधात निदर्शने केली. शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करावेत, असा मागणी फलक झळकावता काँग्रेस खासदारांनी या वेळी ‘नरेंद्र मोदी, किसान विरोधी’ अशी जोरदार घोषणाबाजीही केली. याचे पडसाद दोन्ही सभागृहांमध्ये उमटले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com