संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधार
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधार

संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधार

अमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्याची पातळी खालावल्याने आणि संरक्षित जलस्राेतदेखील कोरडे पडले आहेत. फळबाग जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर ७०० रुपयांत टॅंकर खरेदी करून ओलित करण्याची वेळ आली आहे.  यावर्षी पावसाळा कमी झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी घटली. अशातच विहिरी व बोअरवेलने तळ गाठला. पाण्याअभावी संत्रा झाडावर असलेला मृगबहार शेतकऱ्यांना तोडून फेकावा लागला. त्यामुळे वरुड तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. ज्या शेतकऱ्यांजवळ पाणी होते. त्यांच्यावर सुद्धा या महिन्यात टॅंकरने ओलित करण्याची वेळ आली आहे. पाण्याअभावी संत्राबागा सुकू लागल्या. संत्रापट्टयातील समस्यांची दखल घेत या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी होऊ लागली आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व इतर जलस्राेतांनी देखील तळ गाठला आहे. परिणामी, बागा जगविण्यासाठी त्यांच्याकडून टॅंकरद्वारे पाणी आणले जात आहे. ७०० रुपये टॅंकर असे पैसे त्यासाठी चुकवावे लागत आहेत.  संत्रा झाडे जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्याने तळ गाठल्याने आता टॅंकरने पाणी आणून संत्रा बागा जगविण्याचा प्रयत्न करीत आहोत. ७०० रुपये टॅंकर असे दर आहेत. परंतु, बागेवर अशाप्रकारे किती खर्च होईल. याची माहिती नाही; परिणामी शासनाने आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. - विजय अलोने, संत्रा उत्पादक, बेनोडा, ता. वरुड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com